औरंगाबाद : केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी (Farmer Welfare) प्रयत्नशील आणि कटिबद्ध असल्याचे, प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी केले. कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड औरंगाबाद येथे दि.१७ ऑक्टोबर २०२२ रोजी पी एम किसान सन्मान संमेलन ()PM Kisan Sammelan व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, कृषी सह संचालक डॉ. दिनकर जाधव, जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. सुरेश पटवेकर, कृषी तंत्र विद्यालय प्राचार्य डॉ. किरण जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ.भागवत कराड म्हणाले, की नीम कोटेड युरिया, किसान क्रेडिट कार्ड, शेतकरी सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, किसान कॉल सेंटर, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, शेतकरी पायाभूत सुविधा उभारणी निधी योजना, एक राष्ट्र एक खत योजना, पीएमएफएमई योजना, शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारणी इत्यादी विविध योजना या शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध असून याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
भविष्यात औरंगाबाद जिल्ह्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामाचीही त्यांनी माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने देशाला केलेल्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.किशोर झाडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.