
Nashi News : इगतपुरी तालुक्यात वरुणराजाने मागील पंधरवड्यात सलग दहा दिवस चौफेर हजेरी लावून बळीराजाचे समाधान व शेतामध्ये पावसाची आबादानी केली. मात्र, पूर्व भागात पाऊस कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काही भागात थोडीशी उसंत घेतली आहे.
काही भागांत अधूनमधून पाऊस होत आहे. दारणाकाठच्या गावांत मुख्य पीक असलेल्या भात आवणीला उशिराने का होईना जोमाने सुरुवात झाली आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जपानी पद्धतीचा वापर सुरू केला आहे.
उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यावर टाकलेली भाताची रोपे लावणीला आली असताना, जुलैच्या मध्यावर पावसाने सुरुवात केल्याने काळजीत पडलेला बळीराजा मागील १५ दिवसांच्या पावसाने सुखावला आहे.
त्यामुळे वेळेत कामे उरकण्यात येत असून, ट्रॅक्टरद्वारे मशागत करून शेत तयार केले जात आहे. मात्र, लागवडीसाठी मजुरांवरच अवलंबून राहावे लागत आहे. दारणाकाठच्या गावांमध्ये इंद्रायणी व १००८ या जातीच्या भाताची लागवड केली जाते.
त्यासाठी शेतकरी शेतात रोपे तयार करतात. रोपांच्या चांगल्या वाढीसाठी रासायनिक खते टाकली जातात. जिल्ह्यात पाऊस एकसारखा नाही. मात्र तालुक्याच्या पूर्व भागात सुद्धा याचा प्रत्यय येतो.
इगतपुरीत वरुणराजाची दिवसभर रिमझिम असली तरी पूर्व भागात प्रतीक्षा असल्यामुळे भाताच्या लागवडीसह पेरणी कामांचा खोळंबा होतो. आठ-दहा दिवस चांगला पाऊस होऊन रोपांची चांगली वाढ झाली असून आता आवणीला वेग आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.