ॲग्रोवन वृत्तसेवा
नगर : तालुक्यातील चिलेखनवाडी (Chilekhanvadi), देवसडे येथे अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) पिकांचे नुकसान (Crop Damage) झालेल्या पिकांचे पंचनामे (Panchnama) करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्याप्रकरणी चिलेखनवाडीच्या कृषी सहायक रोहिणी सुभाष मोरे व ग्रामसेविका कविता भास्कर शिंदे तसेच कर्मचारी संजय देवराम इंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नेवासा तालुक्यात सध्या कृषी विभागामार्फत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याकरिता शासनाचे अधिकृत अधिकारी शेतातून जाता गावातील खासगी लोकांना (एजंट) शेतकऱ्यांकडे पंचनाम्यासाठी पाठवीत आहेत. हे खासगी लोक शेतकऱ्यांकडे पंचनामा करण्यासाठी एकरी २०० ते ४०० रुपयांची मागणी केली जात होती.
त्याशिवाय पंचनामे करत नाहीत हे स्पष्ट करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली होती. हे प्रकरण प्रशासनाने गांभीर्याने घेत कृषी सहायक रोहिणी सुभाष मोरे, ग्रामसेविका कविता भास्कर शिंदे व ग्रामपंचायत कर्मचारी संजय इंगळे यांना निलंबित करण्यात केले आहे.
राज्याच्या कृषी सहसंचालकांनी कृषी सहायक रोहिणी सुभाष मोरे यांच्या निलंबनाचा आदेश काढल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी दिली. चिलेखनवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका कविता भास्कर शिंदे यांच्या निलंबनाचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढला असल्याची माहिती गटविकास अधिकारी संजय दिघे यांनी दिली. तर ग्रामपंचायत कर्मचारी संजय देवराम इंगळे याच्या निलंबनाचा आदेश चिलेखनवाडीचे सरपंचानी काढला, असे सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.