
Akola News : या हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसान भरपाईची तक्रार करण्याची अट विमा कंपनीकडून रद्द करावी व सर्व शेतकऱ्यांना सरसकट सर्वेक्षण करून विमा लागू करावा, अशी मागणी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे यांनी केली. याबाबत त्यांनी उचित कार्यवाहीचे कृषी समितीच्या सभेत निर्देश दिले.
कृषी समितीची सभा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अर्चना राऊत, नीता गवई, प्रमोदिनी कोल्हे , वेणू डाबेराव, सुनंदा मानतकर, गीता मोरे, रायसिंग राठोड आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रमोदिनी कोल्हे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली. तेल्हारा तालुक्यात १६१ मिलिमिटर आणि अडगाव मंडलात १८१ पावसाची नोंद झालेली आहे. हीच परिस्थिती सर्व जिल्ह्यांत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली होती.
परंतु ती मदत अतिशय कमी असल्याने १० हजार रुपयांऐवजी शासनाने २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशा वाढीव मदतीची मागणी सदस्यांनी केली. कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची विनंती करणारा ठराव या बैठकीत एकमताने घेण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठवला जाणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.