
Sindhudurg News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे ७५ टक्के भातरोपांच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत.पावसामध्ये सातत्य राहिल्यास पुढील आठ ते दहा दिवसांत पुनर्लागवडीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
यावर्षीचा खरीप हंगाम दरवर्षीपेक्षा २० दिवस उशिराने सुरू झाला.मॉन्सूनचे आगमनच जूनच्या अखेरीस झाले. त्यामुळे भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामाला देखील विलबांने सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भात रोपवाटिका तयार करण्याची कामे सुरू होती.
मात्र तत्पूर्वी पाण्याची उपलब्धता असलेल्या दहा टक्के भात रोपवाटिका मे अखेरीस तयार करण्यात आल्या होत्या. ती भातरोपे २० जूननंतर पुनर्लागवडीस तयार झाली होती. परंतु पावसाअभावी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या भातरोपांची पुनर्लागवडीला सुरुवात झाली.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकांमधील रोपे पुनर्लागवडीस १० जुलैपासून सुरुवात झाली. ही पुनर्लागवड सुरू झाल्यानंतर सतत दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भातरोपे पुनर्लागवडीचे काम अखंडपणे सुरू आहेत. आतापर्यंत ४५ हजार हेक्टरवरील भातरोपे पुनर्लागवडी पूर्ण झाली आहे.
यावर्षी साधारणपणे ६० ते ६२ हजार हेक्टरवर पुनर्लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यास येत्या आठ ते दहा दिवसांत भातरोपे पुनर्लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांत ८५ टक्केपेक्षा अधिक पुनर्लागवडीचे काम पूर्ण झाले आहे. तर कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये ७० टक्के लागवड झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.