
Sindhudurg News : वाढलेली आर्द्रता आणि शेतमळ्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे आचरा परिसरातील भातरोपांवर नाकतोड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात सध्या भातरोप पुनर्लागवडीचे काम वेगात सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे भात रोपवाटिकांमध्ये पाणी साचले असून वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणदेखील वाढले आहे.
त्यामुळे नाकतोड्यांचा प्रादुर्भाव भातरोपांवर दिसून येत आहे. भातरोपे काढणी करताना ही बाब शेतकऱ्यांच्या निर्दशनास येत आहे. भातरोपांच्या कोवळी पातीचे तुकडेतुकडे नाकतोड्यांकडून केले जात आहेत.
नाकतोड्यांच्या प्रादुर्भावामुळे आचरा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर हा नाकतोड्यांचा प्रादुर्भाव असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आचरा येथील शेतकरी आबा सावंत यांच्या मळ्यांमध्ये पहिल्यांदा हा प्रादुर्भाव दिसून आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.