Paus Andaj : उत्तर भारतात पाऊस, गारपीटीचा अंदाज; महाराष्ट्रात १० ते १४ मार्च दरम्यान हवामान कसे राहील ?

Weather Forecast : महाराष्ट्रातही थंडी जाणवणार आहे पण गारपीटीची शक्यता नाही, असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला.
Weather
WeatherAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात सध्या सकाळी थंडी आणि दिवसा ऊन अशी परिस्थिती दिसून येत आहे. तर उत्तर भारतात पाच दिवस पाऊस आणि काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही थंडी जाणवणार आहे पण गारपीटीची शक्यता नाही, असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला. 

दोन दिवसांनंतर वातावरणात होऊ शकणाऱ्या बदलाबाबत श्री खुळे म्हणाले की, एका पाठोपाठ असे दोन पश्चिमी झंजावात १० आणि  १२ मार्चला अर्थात रविवार व मंगळवारी जम्मू काश्मिर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अश्या उत्तर भारतातील पश्चिमी हिमालयीन ३ राज्यात प्रवेश करेल.

Weather
El Nino : मे अखेरपर्यंत ‘एल निनो’चा प्रभाव कायम

त्यामुळे १० ते १४ मार्च असे ५ दिवस तेथे वारा वीजा, गडगडाटीसह पाऊस, हीमवृष्टी व थंडी जाणवेल. परिणामी आपल्याकडे महाराष्ट्रातही त्या ५ दिवसात वातावरण कोरडे राहून केवळ पहाटेची थंडीच फक्त जाणवणारच आहे. पाऊस अथवा गारपीटीची कोणतीही शक्यता महाराष्ट्रात नाही, असाही अंदाज खुळे यांनी दिला. 

तर मुंबईसह संपूर्ण कोकण खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे पहाटेचे तापमान किमान सरासरी तापमानापेक्षा २ अंश सेल्सिअसने कमी राहून  ११ ते १४ अंशाच्या दरम्यान टिकून आहे, असेही खुळे यांनी सांगितले. ह्या एकूण १५ जिल्ह्यांमध्ये पहाटेचा गारवा चांगलाच जाणवत आहे.

Weather
Summer Heat Update : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या

परंतु संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान सरासरीइतके किंवा सरासरीपेक्षा खाली तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा १ ते २ अंशाने वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तापमान भाग बदलत २९ ते ३७ अंशा दरम्यान जाणवत आहे. दुपारनंतर चांगलाच ऊबदारपणा जाणवण्यास सुरवात झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सध्याच्या २०२३-२४ च्या एल-निनो वर्षातील रब्बी पिकांना, फेब्रुवारी १४ ते १४ मार्च २०२४ अश्या  एक महिन्याच्या वाढीव दिवसात भले कमी तीव्रतेची का असेना पण जी थंडी उपभोगण्यास मिळत आहे. ती गेल्या २०२० ते २०२२ अश्या ला-निनोच्या तीन वर्षातही चांगला पाऊस होऊनही महाराष्ट्रातील रब्बी हंगाम पिकांना अशी उत्तम थंडी मिळाली नव्हती.

चालु एल- निनो वर्षातही, उत्तर भारतातील अधिक वारंवारतेच्या पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून महाराष्ट्रात मिळालेल्या थंडीच्या जोरावरच आपण रब्बी हंगाम जिंकत आहोत, हे मुद्दाम पुन्हा पुन्हा नमूद करावेसे वाटते. अन्यथा गेल्या खरीप पीकासारखी रब्बी पिकांची अवस्था झाली असती, असेही श्री. खुळे यांनी नमूद केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com