Pune News : राज्यात काही ठिकाणी गारपीट आणि वादळी पाऊस पडत आहे. तर कोकणात उष्णतेटी लाट आणि उकाडा जाणवत आहे. राज्यातील ही परिस्थिती आणखी पुढील पाच दिवस राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील ५ दिवस उष्णतेची लाट आणि उकाडा राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला. तसेच रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे.
यवतमाळ, बुलडाणा, अकोला, बीड, सांगली, सातारा, पुणे, नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलडणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया,
नागपूर, वर्धा, वाशीम, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील पाचही दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
भंडारा, जालना, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे उकाडाही चांगलाच वाढला. तर उष्णताही जास्त जाणवत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.