
Pune News : राज्यात थंडीचा कडाका काही भागात कायम आहे. तर दुपारचे तापमान काही भागात सरासरीपेक्षा जास्त दिसते. पुढील आठवड्यात राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणा राहण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या तापमानात चढ उतार सुरुच आहेत. महाराष्ट्रासह उत्तर भारतात थंडी टिकून आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी किमान तापमान कायम दिसते. पुढील काळात हवामान कसे राहू शकते, याविषीय बोलताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की,
पश्चिमी झंजावातामध्ये वर्षाचा शेवट थंडीने होऊ होणार आहे. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात सकाळचे किमान तापमान १२ अंश सेल्सिअस तर मुंबईसह कोकणात १७अंश सेल्सिअसच्या आसपास असू शकते.
२९ डिसेंबरला उत्तर भारतातून येणाऱ्या पश्चिमी झंजावातातून जमिनीपासून उच्च पातळीवर थंडी आणि दक्षिण भारतातून महाराष्ट्रपर्यंत निम्न पातळीतून पोहोचणाऱ्या पूर्वझोती वाऱ्यांच्या मिलापातून मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर ते सोलापूर पर्यंतच्या १० जिल्ह्यांमध्ये तसेच धाराशिव व लातूर या १२ जिल्ह्यांमध्ये ३१ डिसेंबर ते २ जानेवारी ह्या तीन दिवसांदरम्यान ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काहीशी थंडी ओसरून ऊबदारपणा जाणवेल.
मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता फारच कमी आहे. पण पाऊस झालाच तर मध्य प्रदेशलगतच्या खानदेशातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्यांच्या तुरळक भागात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचेही खुळे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.