
Weather Prediction: महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मंगळवारी (ता.८) हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी होतील. मात्र बुधवारी (ता.९) हवेचे दाब पुन्हा वाढून ते १०१० हेप्टापास्कल होतील. त्यामुळे राज्यातील हवामान अल्पसे ढगाळ राहील. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा व सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल. तशीच स्थिती सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि गडचिरोली जिल्ह्यांत असेल.
प्रामुख्याने मॉन्सून पूर्वकाळात एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे तसेच उत्तर महाराष्ट्र, मध्य व पूर्व विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहते. यावरून चांगल्या मॉन्सूनची पूर्वतयारी सुरू झाल्याचे स्पष्ट होते. उत्तर भारतातील भागावर हवेचे दाब कमी होत आहेत, तर दक्षिण भारतावरील हवेचे दाब वाढत आहेत. विदर्भात तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्यामुळे दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत मोठ्या प्रमाणात घट होईल. त्यामुळे दुपारी उष्ण लहरी जाणवतील. या आठवड्यात राज्यात वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. विदर्भात किमान तापमानातही वाढ होईल. त्यामुळे सकाळचे थंड हवामान कमी होऊन सकाळपासूनच उष्ण हवामान जाणवेल.
अरबी समुद्राच्या व हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असल्याने मोठ्या प्रमाणात बाष्प निर्मिती होईल. मोठ्या प्रमाणात बाष्प दक्षिणेकडून उत्तरेचे दिशेने वाहत राहील. पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान प्रशांत महासागराच्या पेरुजवळ १८ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २८ अंश सेल्सिअस राहण्यामुळे ‘एल-निनो’चा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे तो तटस्थ राहील. यावरून यंदा मॉन्सून चांगल्या असण्याची शक्यता दिसून येत आहे.
कोकण
आज (ता.६) पालघर व रत्नागिरी जिल्ह्यांत १ मि.मी. व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ३२
अंश सेल्सिअस राहील. तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि पालघर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पालघर जिल्ह्यात ६८ टक्के, तर सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ७२ ते ७८ टक्के
आणि रत्नागिरी जिल्ह्यात ८० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ४१ टक्के, तर पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ५२ ते ५८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत २ ते ५ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ईशान्येकडून, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस आणि धुळे जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ४१ ते ४६ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ६१ टक्के राहील.
दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन धुळे जिल्ह्यात १० टक्के, नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत २३ टक्के आणि जळगाव जिल्ह्यात ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग जळगाव जिल्ह्यात ५ कि.मी., तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ताशी ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत नैॡत्येकडून, तर धुळे जिल्ह्यात आग्नेयेकडून राहील.
मराठवाडा
कमाल तापमान बीड जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव व जालना जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. तर लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. मात्र जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४० ते ४८ टक्के, तर धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ५५ ते ५८ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत २१ ते २३ टक्के, तर धाराशिव, बीड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३० ते ३९ टक्के इतकी राहील. धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी., तर लातूर व नांदेड जिल्ह्यात ताशी ८ ९ कि.मी. राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३८ ते ३९ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ३६ टक्के, तर बुलडाणा अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४२ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील.
मध्य विदर्भ
कमाल तापमान यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३८ ते ३९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अत्यंत कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ५ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
गडचिरोली जिल्ह्यात आज अल्पशा पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान गोंदिया जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात
२७ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत ४६ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्यात ५२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ८ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १० ते ११ टक्के इतकी राहील. वाऱ्याचा ताशी वेग भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ५ ते ६ कि. मी., तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ७ ते ८ कि. मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील.
पश्चिम महाराष्ट्र आज कोल्हापूर जिल्ह्यात २ मि. मी., सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत १ मिमी पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत २ ते ४ कि.मी. इतका कमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर सातारा व पुणे जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, सोलापूर जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अहिल्यानगर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, कोल्हापूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर सातारा व पुणे जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ७५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ४५ टक्के राहील.
कृषी सल्ला
काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.
काढणीस तयार आंब्याची काढणी झेल्याच्या साहाय्याने देठासह चौदा आणे (८५ ते ९० टक्के) पक्वतेला करून घ्यावी.
नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.
फळबाग लागवडीमध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.
उष्णतेच्या ताणामुळे जनावरांच्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. यासाठी जनावरांना नियमितपणे पुरेसे पाणी आणि योग्य खुराक द्यावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.