Crop Insurance : शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यास विमा कंपनीचा आक्षेप

विमा कंपनीने याविरुद्ध अपिल दाखल करीत उत्पादकता कमी येणार नसल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या संयुक्त सर्व्हेक्षणांमध्ये अपेक्षित उत्पन्न चांगले, सरासरी पीक परिस्थिती दर्शवीत आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

अकोला ः प्रतिकूल परिस्थितीमुळे यंदाच्या हंगामात पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान पीकविम्यात (Crop Insurance) जोखमीच्या बाबीअंतर्गत नुकसान भरपाई (Crop Damage Compensation) निश्‍चित करीत विमा काढलेल्या उत्पादकांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याबाबत विमा कंपनीला निर्देश दिले होते. मात्र ही बाब कंपनीने अमान्य केली असून, याविरुद्ध अपील दाखल केले आहे. त्यावर पहिली सुनावणीसुद्धा सोमवारी (ता. २६) झाली.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा म्हणजे कंपनी ‘कल्याण’

शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश काढले होते. या आदेशानुसार आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत सोयाबीन पिकासाठी पात्र महसूल मंडळातील विमाधारकांना मदत द्यावी, असे सुचविले होते.

Crop Insurance
Crop Insurance : स्ट्रॉबेरीसाठी आंबिया बहर विमा योजना

पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे शेतकऱ्यांना चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. या बाबत अधिसूचना जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांना काढण्याचे अधिकार मिळालेले आहे. त्याचा वापर करीत जिल्हाधिकारी अरोरा यांनी विमा कंपनीला निर्देश दिले.

सोयाबीन पिकासाठी अकोट तालुक्यातील कुटासा, चोहोट्टा बाजार, मूर्तिजापूरमधील लाखपुरी, निंभा, शेलूबाजार, बाळापूर तालुक्यातील पारस, व्याळा, उरळ, निंबा, हातरूण, अकोला तालुक्यात आगर, अकोला, घुसर, कापशी, उगवा, बोरगाव, पळसोबढे, कुरणखेड, दहिहंडा, कौलखेड, सांगळूद, शिवणी, बार्शीटाकळी आणि तेल्हारा तालुक्यात पंचगव्हाण आदी मंडळांचा समावेश करण्यात आला होता.

विमा कंपनीने याविरुद्ध अपिल दाखल करीत उत्पादकता कमी येणार नसल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या संयुक्त सर्व्हेक्षणांमध्ये अपेक्षित उत्पन्न चांगले, सरासरी पीक परिस्थिती दर्शवीत आहे. यासाठी आम्ही वास्तविक पीक स्थिती दर्शविणारी छायाचित्रे सादर करू. या हंगामात उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी येणार नाही, असा दावाही कंपनीच्या वतीने करण्यात आला. मात्र जिल्हा प्रशासनाने कंपनीचे दावे अमान्य केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता कंपनीकडून आता पुढील अपील राज्यस्तरावर केल्या जाण्याची शक्यता आहे.

शेतकरी लटकले

यंदा झालेला सततचा पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे पिकांचे नुकसान पाहता जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीला २५ टक्के रक्कम आगाऊ देण्याचे निर्देश दिले होते. पण तेच अमान्य करीत कंपनीने अपील दाखल केल्याने आता दसरा-दिवाळीत अपेक्षित असणारी संभाव्य मदत लटकल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात अतिपावसाने सर्वच भागात नुकसान झालेले आहे. विमा कंपनी ज्या पुराव्यांच्या आधारे उत्पादन कमी होणार नसल्याचे सांगत आहे त्या बाबी आणि ग्राऊंड लेव्हलवरील परिस्थिती यात मोठी तफावत आहे. पीक नुकसान कसे व किती झालेले त्याची अनेक उदाहरणे आम्‍ही दाखवू शकतो. सर्वच मंडळांतील शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ मदत मिळायलाच हवी, अशी वस्‍तुस्थिती आहे.
डॉ. प्रकाश मानकर, अध्यक्ष, भारत कृषक समाज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com