
Sangli News : राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीक विमा घेण्यासाठी प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ७५९ शेतकऱ्यांनी पीकविमा घेत १ लाख ९१ हजार ९१५ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले आहे. जत तालुक्यातून सर्वाधिक १,४४,७०१ शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेती ओलिताखाली आली आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे पिकांचे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी, यासाठी पीकविमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत अर्ज करणे आवश्यक आहे. निसर्गकोपाच्या संकटातून सावरण्यासाठी पंतप्रधान विमा योजनेला पसंती दिली जाते.
अवेळी पावसामुळे अनेक वेळा हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे पीकविमा देऊन संरक्षण दिले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांना विमा घेऊन संरक्षण देतात.
शेतकऱ्यांनी संबंधित पिकांचा विमा उतरल्यानंतर सरकारकडूनही काही प्रमाणात विम्याचा हिस्सा भरला जातो. यंदाच्या खरीप हंगामापासून एक रुपयात पीकविमा योजनेचा प्रारंभ केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीकविमा घेण्यासाठी प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात सन खरीप २०२२ मध्ये कर्जदार शेतकरी आणि बिगर कर्जदार शेतकरी असे मिळून २५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरला होता. या वर्षी एक रुपयात पीकविमा असल्याने विक्रमी ३ लाख ७७ हजार ७५९ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, १ लाख ९१ हजार ९१५ हेक्टर क्षेत्र विमा घेऊन संरक्षित केले आहे. शेतकऱ्यांचे एक रुपयाप्रमाणे ३ लाख ७७ हजार ५७७ रुपये जमा झाले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.