संकटकाळात अन्न सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण ः सोनिया गांधी

नवी दिल्ली ः कोरोना विषाणूच्या संकटजन्य परिस्थितीमुळे ओढावलेल्या लॉकडाउननंतर काय? असा प्रश्न कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांचे खास आभार मानले. संकटजन्य परिस्थितीतही पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी भरघोस गहू उत्पादन करत अन्न सुरक्षेसाठी मोठे योगदान दिले. शेतकऱ्यांचे हे योगदान देशासाठी महत्वपूर्ण आहे, असे त्या म्हणाल्या.
काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
Published on
Updated on

नवी दिल्ली  ः  कोरोना विषाणूच्या संकटजन्य परिस्थितीमुळे ओढावलेल्या  लॉकडाउननंतर काय? असा प्रश्न कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांचे खास आभार मानले. संकटजन्य परिस्थितीतही पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी भरघोस गहू उत्पादन करत अन्न सुरक्षेसाठी मोठे योगदान दिले. शेतकऱ्यांचे हे योगदान देशासाठी महत्वपूर्ण आहे, असे त्या म्हणाल्या.   

बुधवारी सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मदत निधीसह उपाययोजनेबाबत केंद्र सरकारची पुढील रणनिती काय असा प्रश्न सोनिया गांधींनी उपस्थित केला आहे.  

या चर्चेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी, अशोक गहलोत तसेच अन्य काँग्रेसच्या नेत्यांसह पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, पुदुच्चेरी राज्याचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. लॉकडाउनची नामुष्की आणखी किती दिवस राहिल? कोणत्या मापदंडातून लॉकडाउन कालावधी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जातो हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी त्यांनी १७ मेनंतर काय? लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय घेत असताना केंद्र सरकार कोणते मापदंड लावणार? यासारखे प्रश्न उपस्थितीत केले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधींनी मांडलेल्या प्रश्नांचे समर्थन केले. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर केंद्र सरकार कोणती पावले उचलणार याबाबत माहिती असणे, गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

 राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी १० हजार कोटीच्या पॅकेजची मागणी केंद्राकडे केल्याची माहिती दिली. केंद्र सरकारने याबाबत कोणताही पाठपुरावा केला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत बसून देशभरातील परिस्थितीचा अंदाज बांधू नये, असे सांगत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केंद्र सरकारने राज्याचा आढावा घेऊन आवश्यक निधी द्यावा, असे म्हटले आहे.  

‘केंद्र सरकारने रणनीती स्पष्ट करावी’ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्चपासून देशव्यापी लॉकडाउनची परिस्थिती आहे. अनेक उद्योग-धंदे बंद असल्यामुळे ‘कोरोना’चा नायनाट करत असताना अर्थिक संकटातही भर पडत आहे. केंद्र सरकारने ठोस भूमिका घेत देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठीची पुढील रणनीती स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसकडून होताना दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com