आठ जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा

उन्हाचा चटका वाढू लागल्याने पाणीटंचाई तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांत पाणीटंचाई भेडसावत आहे. सध्या ५१ गावे आणि १२९ वाड्यावस्त्यांना ५९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
आठ जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा
आठ जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा

पुणे ः उन्हाचा चटका वाढू लागल्याने पाणीटंचाई तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांत पाणीटंचाई भेडसावत आहे. सध्या ५१ गावे आणि १२९ वाड्यावस्त्यांना ५९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काळात उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्यास पाणीटंचाईही आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे.   गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाणीटंचाईमध्ये चांगलीच वाढ झाली होती. ही कमी करण्यासाठी शासनाने लोकसहभाग आणि कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे हाती घेऊन पूर्ण केली. राज्यात गेल्या वर्षी पावसाळ्याच्या चार ते पाच महिने चांगला पाऊस झाल्यामुळे भूजलपातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे विहिरीत आणि बोअरवेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले होते.  परिणामी, चालू वर्षी पाणीटंचाई कमी होण्याची शक्यता होती. मात्, रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी भूगर्भातील पाण्याचा अधिक उपसा केल्यामुळे पुन्हा भूजलपातळी खोल जाऊ लागली आहे. त्‍यामुळे राज्यात मार्चपासूनच पाणीटंचाई भेडसावू लागली आहे.  गावे आणि १११ वाड्यांना शासकीय व खासगी यंत्रणेमार्फत ८७ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये सर्वाधिक पाणीटंचाई औरंगाबाद विभागात जाणवत होती. विभागातील ३४ गावे, ४ वाड्यांना ४० टँकरने पाणीपुरवठा केला जात होता.  नाशिक विभागातील ६ गावे, १६ वाड्यांना ८ टँकर, पुणे विभागातील ३ गावांतील ३ टँकर, ठाणे विभागातील ३३ गावे, ९१ वाड्यांना ३३ टँकर, अमरावती विभागातील ३ गावांत ३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तर नागपूर विभागात एकही टँकर सुरू नव्हता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात टँकरची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर कमी करण्याची गरज आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक पाणीटंचाई भासलेल्या औरंगाबाद विभागात अजून एकही टँकर सुरू झालेले नाही. ठाणे विभागात पाणीटंचाई चांगलीच भेडसावू लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विभागात टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या ३४ गावे १२६ वाड्यांना ४२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे विभागात टँकरच्या संख्येत घट झाली असली तरी हळूहळू पाणीटंचाई डोके वर काढू लागली आहे. जिल्हानिहाय टँकरची संख्या  (कंसात गेल्या वर्षीची संख्या )  जिल्हा आणि  यंदाची संख्या :  ठाणे १८ (२१),  रायगड ५ (0), रत्नागिरी ३ (२), पालघर १६ (१०), नगर  ० (८), सातारा २  (0),  सांगली ० (३), बीड ० (१४), उस्मानाबाद ० (१),  अमरावती २ (१), बुलडाणा ६ (०), यवतमाळ ७ (२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com