नाशिक : सध्या शेती व उद्योग अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी शेतकरी, व्यापारी व उद्योजकांच्या अडचणी समजून घेत मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा करून अडचणीतून मार्ग काढणार, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कृषी, व्यापार व उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना दिले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीतर्फे ऑनलाइन ई-चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. शेती, लघु व मध्यम उद्योग याबाबतीत अडचणी यावर श्री. झिरवाळ यांनी सहभागी घटकांकडून समस्या जाणून घेतल्या. सहभागी घटकांनी लघुतम, लघू व मध्यम उद्योग तसेच व्यापारी व शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या अडचणींबाबत श्री. झिरवाळ यांचे लक्ष वेधले. यात संचारबंदीनंतर उद्योजकांना खेळत्या भांडवलाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे व्यवसाय कर, कामगार निधी व ईएसआयसीचा मोठा निधी सरकारकडे जमा आहे. त्याचा उपयोग कामगारांच्या वेतनासाठी व उद्योजकांच्या खेळत्या भांडवलासाठी व्हावा, अशी मागणी करण्यात आली.
सद्य अडचणी मांडून उद्योगांच्या उभारीसाठी विशेष पॅकेजची मागणी केली. या ई चर्चासत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, विश्वस्त आशिष पेडणेकर, विलास शिरोरे, शुभांगी तिरोडकर, अनिल लोढा, रवींद्र मानगवेकर, करुणाकर शेट्टी, राजू राठी यांसह राज्यातील सर्व विभागांतील विभागीय चेंबर्स आणि त्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
चर्चेतील प्रमुख मुद्दे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.