पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील वाटाण्याचा गोडवा गायब

पावसाने बटाटा पिकाचे नुकसान झाल्याने आम्ही त्याच शेतीत पुन्हा नव्या जोमाने वाटाणा पिकातून उत्पन्न घेण्यासाठी आटापिटा केला खरा, पण तोही आत्ताच्या पावसाने निष्फळ ठरवला आहे. शासनाने मुसळधार पावसाने वाया गेलेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी. - सुभाष दुधाने, शेतकरी, खिंगर
पावसामुळे वाटाणा पिकाला फटका बसला आहे
पावसामुळे वाटाणा पिकाला फटका बसला आहे

भिलार, जि. सातारा  : महाबळेश्वर तालुक्यात दमदार पावसामुळे बटाट्यापाठोपाठ आता वाटाण्याचेही पीक हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.

महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भाग हा शेतीवर अवलंबून आहे. येथील शेती ही डोंगरमाथा, डोंगउतार आणि तांबड्या मातीची असल्याने या तालुक्यात बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जुलै, आॅगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने बटाटा पीक हातचे गेल्याने शेतकरी हतबल झाले होते. निराश न होता यावर उपाय म्हणून नियमित शेती तर काहींनी नुकसानग्रस्त बटाटा शेती नांगरून वाटण्यासाठी मशागत केली. उन्हाने तोंड दाखवताच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाटाण्याची पेर केली.

बटाट्याचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी वाटाणा पिकाला प्राधान्य दिले. आठ दिवसांपूर्वी पेरलेला वाटाणा मातीतून उगवू लागला आणि गेले चार ते पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने उगवणीला आलेल्या वाटाण्याची रोपे काळी पडू लागल्याने वाटाणाही हातचा गेला आहे. त्यामुळे शेतकरी शेती आणि निसर्गाच्या या चक्रापुढे हतबल झाल्याचे चित्र पहाव्यास मिळत आहे.  यावर्षी तालुक्यात सरासरी ४८० हेक्टरवर वाटाणा पिकाची लागवड झाली आहे. पावसामुळे या पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com