आंबिया बहारातील आठ फळपिकांसाठीची विमा नोंदणी सुरू...

आंबिया बहारातील आठ फळपिकांकरीता हवामान आधारित विमा योजनेचे काम राज्याच्या ३० जिल्ह्यांमध्ये सुरू झाले आहे.
आंबिया बहारातील आठ फळपिकांसाठीची विमा नोंदणी सुरू...
आंबिया बहारातील आठ फळपिकांसाठीची विमा नोंदणी सुरू...
Published on
Updated on

पुणे: आंबिया बहारातील आठ फळपिकांकरीता हवामान आधारित विमा योजनेचे काम राज्याच्या ३० जिल्ह्यांमध्ये सुरू झाले आहे. कर्जदार शेतकऱ्यांना विमा नको असल्यास तसे घोषणापत्र न दिल्यास बॅंका परस्पर विमाहप्ता कापणार आहेत.  पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविली जाते. यंदा  २०२०-२१ या वर्षासाठी अर्ज स्वीकारणी केव्हा सुरू होणार याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती. द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, काजू व स्ट्रॉबेरी (प्रायोगिक तत्त्वावर) ही फळपिके या योजनेत आहेत. सरकारची भारतीय कृषी विमा कंपनी यंदा (पत्ताः मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्चेंज टॉवर्स, २० वा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट मुंबई - ४०००२३)  बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली,धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबारमध्ये काम करणार आहे.  सरकारी विमा कंपनीबाबत शेतकऱ्यांना काही समस्या असल्यास ०२२-६१७१०९१२ या दुरध्वनीवर किंवा १८००११६५१५ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधता येईल. तसेच कंपनीशी mhwbcis@aicofindia.com या ई-मेलवर देखील संपर्क करता येणार आहे. रायगड, बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्याचे कंत्राट बजाज अलायन्झ कंपनीला मिळाले आहे. सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर,अहमदनगर, अमरावती,  सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ जिल्ह्याचे कंत्राट एचडीएफसी अर्गो कंपनीने मिळवले आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास तसे घोषणापत्र अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बॅंकेत आणून देणे सक्तीचे करण्यात आहे. घोषणापत्र न आल्यास बॅंका परस्पर विमाहप्ता कापणार आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे तसेच कूळ किंवा भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

गारपिटीसाठी जादा रक्कम मोजावी लागेल विमा अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत द्राक्षाकरिता १५ ऑक्टोबर आहे. स्ट्रॉबेरीला १४ ऑक्टोबर,  मोसंबी व केळीला ३१ ऑक्टोबर तसेच  काजू, कोकण आंबा व संत्रा बागांसाठी ३० नोव्हेबरपर्यंत तर डाळिंब व कोकण वगळता इतर जिल्ह्यातील आंबा बागांचे अर्ज ३१ डिसेंबरपर्यंत भरता येतील. पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता व वेगाचे वारे या नैसर्गिक धोक्यांपासून शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. मात्र, गारपिटीपासून विमा संरक्षण हवे असल्यास शेतकऱ्यांना जादा रक्कम मोजावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com