हंगाम पूर्ण होण्याआधीच कपाशी काढण्याची वेळ

सततच्या पावसाने झालेले नुकसान, उत्पादनात झालेली घट आणि बोंडआळीचा प्रादुर्भाव यामुळे यंदा नगर जिल्ह्यात हंगाम पूर्ण होण्याआधीच कापसाचे पीक काढावे लागत आहे.
cotton crop
cotton crop
Published on
Updated on

नगर ः पुणे सोलापूर सातारा नगर कोरोना सततच्या पावसाने झालेले नुकसान, उत्पादनात झालेली घट आणि बोंडआळीचा प्रादुर्भाव यामुळे यंदा नगर जिल्ह्यात हंगाम पूर्ण होण्याआधीच कापसाचे पीक काढावे लागत आहे. बहूतांश भागांत कापसाची उपटणी केली जात आहे. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा पाण्याची उपलब्धता असल्याने कापसाची उपटणी करुन त्याजागी गहू, हरभरा, मका, कांद्याची लागवड केली जात असल्याचे दिसून येत आहे. यंदा उन्हाळी बाजरीचे क्षेत्रही वाढण्याची शक्यता आहे.  नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत कापसाचे क्षेत्र वाढत आहे. यंदा एक लाख पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने, नैसर्गिक संकटाने कापसाचे पीक सततच तोट्याचत जात आहे. यंदाही कापूस अडचणीत आला.  सततचा पाऊस व बोंडआळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे नुकसान झाले. आलेल्या दोड्याही सडल्या. बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागानेही काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. त्याचा आर्थिक फटका कापूस उत्पादकांना बसला आहे. त्यामुळे यंदा हंगाम पुर्ण होण्याआधीच कापसावर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे. सध्या कापसाची उपटणी चालू आहे. आत्तापर्यंत साठ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कापूस उपटून टाकला आहे. उपटणी केली  आहे.  नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागासह सर्वच ठिकाणी यंदा बंधारे, नद्या, ओढे, तलाव भरलेले असल्याने भूजल पातळी चांगली आहे. विहिरी, कूपनलिकांना चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे वाया गेलेला कपाशीचा हंगाम पूर्ण होण्याची वाट न पाहता, ती वेळेआधीच काढण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. हाती आलेला थोडाफार कापूस विकून रब्बीच्या पिकांची तयारी सुरू  आहे.

मिळालेली मदतही तोकडी अतीवृष्टी, सततचा पाऊस यामुळे कापसाचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचानामे करुन नुकसान भरपाई दिली मात्र दिलेली मदत ही तोकडी आहे. एका एकरात कापसातून साधारण पंचवीस हजाराचे नुकसान झालेले असताना सरकार मात्र हेक्टरी दहा हजार म्हणजे एकरी चार हजार रुपये नुकसान भरपाई देत आहे. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून मिळालेली रक्कमही तोकडीच आहे. त्यात ज्या भागात ६५ मिलीमीटरच्या वर पाऊस झाला तेथेच पंचनामे झाले आहेत. त्यामुळे काही भागात नुकसान होऊन पंचनामे करण्याला कृषी विभागाकडून टाळाटाळ झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com