उन्हाळा कांदा लागवडीचा प्रश्‍न गंभीर वळणावर 

नाशिक : चालू वर्षी मॉन्सूनोत्तर पावसामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला उन्हाळा कांदा लागवडी रखडल्या. मात्र नंतरच्या टप्प्यात वातावरण निवळल्यानंतर एकदाच लागवडी आल्याने मजूरटंचाईचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे.
The question of summer onion cultivation is at a critical juncture
The question of summer onion cultivation is at a critical juncture

नाशिक : चालू वर्षी मॉन्सूनोत्तर पावसामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला  उन्हाळा कांदा लागवडी रखडल्या. मात्र नंतरच्या टप्प्यात वातावरण निवळल्यानंतर एकदाच लागवडी आल्याने मजूरटंचाईचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. ‘‘शेत तयार, रोपे तयार; मात्र मजूर मिळेना त्यामुळे उन्हाळ कांदा लागवड एक युद्धच’’असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदरीत उन्हाळ कांदा लागवडीचा प्रश्‍न गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे.  जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर तालुक्यांत उन्हाळ कांदा लागवडीला वेग आला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी मजुरांअभावी कोंडीत सापडल्याची स्थिती आहे. गावागावांमध्ये कांदा लागवडीसाठी मजुरांच्या टोळ्या आहेत; मात्र बाहेरच्या गावात अधिकचा दर मिळविण्यासाठी मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते आहे. ज्यांना तातडीने लागवडी करायच्या अशा शेतकऱ्यांना त्यांची ने-आण, चहापाणी अन् एवढेच काय तर त्यांच्या मनमानी दर घेऊन लागवडी पूर्ण कराव्या लागत आहेत. एकंदरीतच लागवडीसाठी चालू वर्षी अव्वाच्या सव्वा रुपये मोजण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  एकीकडे मजूर उपलब्ध होईना अन् झालेच तर अधिक दराची बोली करून जो अधिक दर देईल त्याच्या क्षेत्रात लागवडीला मजूर पसंती देत आहेत. आता लागवडी करायच्या; तर मजूर टोळ्या अधिक भाव देणाऱ्यांना पसंदी देत असल्याची स्थिती आहे. एकीकडे कृषिपंपासाठी वीजपुरवठ्याचा प्रश्‍न, वेळेवर मजूरअभावी खोळंबलेल्या लागवडीमुळे कांद्याचे रोपे खराब होत आहेत.  जिल्ह्यात ७२ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर (ता.२३) अखेर कांदा लागवडी पूर्ण झाल्याने विक्रमी कांदा लागवडीचा अंदाज आहे. एकीकडे इंधन दरवाढ, खतांच्या वाढलेल्या किमती त्यात कांद्याला काढणीपश्‍चात किफायतशीर दर मिळत नसल्याने कांदा शेती करावी की नाही, अशी द्विधा परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये आहे.  ५० टक्क्यांनी लागवड खर्चात दरवाढ  मजूर खूप अडवणूक करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी ७ ते ८ हजारांवर असलेली एकरी लागवड मजुरी आता काही ठिकाणी १० ते १२ हजारांवर गेली आहे. अनेक ठिकणी मजूर भेटत नसल्याने रात्रीची लागवडी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे दिवाळे निघायची वेळ आली आहे.  मजूरटंचाईमुळे कांदे लागवडीला मजूर भेटत नाही. लाल कांदे खराब झाले. कांदा लागवडीचे एकरी दर दहा ते बारा हजार रुपये झाल्याने शेतकरी वैतागून गेला आहे.रोप लावायला आली पण मजुरांमुळे दहा ते पंधरा दिवस लेट लागवड होणार आहे.  -प्रदीप देवरे, शेतकरी, वाजगाव, ता. देवळा  मजुरांची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात जाणवत असून, उशिराच्या पावसाने रब्बी कांदा लागवडी व खरीप कांदा काढणी एकाच वेळेस आल्याने मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. आठ ते नऊ हजार एकरी असलेली मजुरीचा भाव अकरा हजाराच्या पुढे गेलाय.  -हरिभाऊ महाजन, शेतकरी-शेवगे, ता. येवला 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com