
१. तुरीचे दर दबावात असून पुरवठा मुबलक व उत्पादन वाढीच्या शक्यतेमुळे भाव कमी राहण्याचा अंदाज आहे.
२.टोमॅटो, बटाटा, मेथी आणि डाळिंब या पिकांना कमी आवक व चांगल्या मागणीमुळे दर वाढलेले आहेत किंवा टिकून आहेत.
३. पावसाचा फटका व उत्पादनातील विलंब यामुळे पुढील काही आठवड्यांतही या पिकांच्या दरात तेजी राहण्याची शक्यता आहे.
मेथीचा भाव टिकून
भाजीपाला बाजारातील तेजी टिकून आहे. पावसामुळे लागवडी अनेक भागात खराब झाल्या. तर नुकत्याच टाकलेले प्लाॅट वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे बाजारातील आवक कमी आहे. याचा आधार दराला मिळत आहे. मेथीची आवकही मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे मेथील सध्या बाजारात ३ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहे. तर प्रतिजुडी ११ ते १२ रुपये दर आहे. मेथीची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेथीचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
बटाट्याला उठाव
बटाट्याला देशातील बाजारात उठाव आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्याने बटाट्याला मागणी आहे. इतर भाजीपाल्याच्या तुलनेत बटाटा दर टिकूनही आहेत. त्यामुळे बटाटा दराला आधार आहे. विशेष म्हणजे देशात यंदा बटाटा उत्पादन चांगले राहीले. असे असले तरी मागणीमुळे बाजारातील दर गेल्या २ महिन्यांपासून स्थिर आहेत. बटाट्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
डाळिंबाला उठाव कायम
वांगी बाजारातील आवक कमीच आहे. मागील महिनाभरात झालेल्या पावसाचाही डाळिंब पिकाला फटका बसला. त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहेत. डाळिंबाला उठाव चांगला असला तरी पुरवठा कमी आहे. त्यातही गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव तेजीत आहेत. डाळिंबाला आज सरासरी ७ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला. डाळिंबाची बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादीतच राहू शकते. त्यामुळे दरही तेजीत राहतील, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
तुरीचा भाव दबावातच
देशातील तुरीच्या बाजारात मंदी आहे. तुरीचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. सध्या आयात तुरीपेक्षा देशातील दर कमी आहेत. देशातील बाजारात तुरीचा भाव ६ हजार ३०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर आयात तुरीचे भाव देशातील भावापेक्षा सरासरी २०० ते ३०० रुपयांनी जास्त आहेत. त्यामुळे सध्या आयातीचे प्रमाण कमी होत आहे. मात्र यंदा देशातील उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्त राहील आणि आयातही वाढेल, यामुळे तुरीच्या भावावर दबाव राहील, असा अंदाज काही अभ्यासकांनी व्यक्त केला. देशात सध्या तुरीचा पुरवठा मुबलक आहे. याचा दरावर दबाव राहील, असा अंदाजही अभ्यासकांनी व्यक्त केला.
१. सध्या तुरीचे दर कमी का आहेत?
देशांतर्गत तुरीचा पुरवठा भरपूर आहे, तसेच यंदाच्या हंगामात उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे.
२. टोमॅटोच्या दरात वाढ का झाली आहे?
पावसामुळे पीक खराब झाले असून, नव्या लागवडीचा माल बाजारात येण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे आवक कमी झाली आणि दर वाढले.
३. मेथीचे दर सध्या कसे आहेत?
मेथीचे दर ₹3000 ते ₹5000 प्रति क्विंटल दरम्यान आहेत. कारण लागवडी मर्यादित असून मागणी अधिक आहे.
४. बटाट्याला मागणी का वाढली आहे?
इतर भाजीपाला महाग झाल्यामुळे बटाटा तुलनेने परवडतो. यामुळे मागणी वाढली असून दर गेल्या दोन महिन्यांपासून स्थिर आहेत.
५. डाळिंबाचे दर वाढण्यामागचे कारण काय आहे?
पावसामुळे डाळिंबाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे, शिवाय गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई आहे. त्यामुळे दर तेजीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.