
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे दुपारपर्यंत १२.९७ सेंटवर आले होते. तर सोयापेंड ३९७ डाॅलरपर्यंत कमी झाले होते. देशात प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन दरात क्विंटलमागं २५ ते ५० रुपयांची घट झाली होती. सोयाबीनला आजही प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपये भाव मिळाला. सोयाबीन भावातील चढ उतार आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असं अभ्यासकांनी सांगितलं.
देशातील बाजारात मागील तीन दिवसांपासून कांदा भावात ३०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. कांद्याला सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील कांदा आवक कमी होताना दिसत आहे. पुढील दोन महिन्यात कांदा आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा दरात पुढील काळात आणखी सुधारणा होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
देशात श्रावण मासामुळे केळीला उठाव मिळत आहे. उत्तर भारतात दोन महिन्यांचा श्रावण साजरा होत असल्याने केळीला मागणी वाढली. राज्यातही मागणी येत आहे. यामुळे केळीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये केळीच्या भावात सुधारणा झाली. केळीला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील महिनाभरात केळीच्या भावात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
गवारच्या भावात मागील काही दिवसांपासून चांगली वाढ झाली. बाजारात सध्या गवारची आवक खूपच कमी असून मागणी मात्र चांगली आहे. राज्यातील महत्वाच्या बाजारांंमधील आवक सरासरीपेक्षा ४० टक्क्यांपर्यंत कमी आहे. त्यामुळे गवारला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काही दिवस गवारची आवक वाढण्याचा अंदाज कमीच असून दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात मागील दोन दिवसांमध्ये कापूस दरात सुधारणा दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारात कापसाला मागणी वाढली. याचा आधार कापूस दराला मिळाला. देशात कापसाची लागवड आतापर्यंत दीड टक्क्याने पिछाडीवर दिसते. यंदा जून महिन्यात पावसाने दडी दिली होती. त्यामुळे लागवडी कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. गेल्या हंगामात ४ ऑगस्टपर्यंत १२१ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. तर मात्र यंदा ही लागवड ११९ लाख हेक्टरवर पोचली. गुजरातमध्ये यंदा कापूस लागवडीत चांगली वाढ झाली. पण मागील एक आठवड्यापासून देशातील बहुतांशी कापूस उत्पादक पट्ट्यात पाऊस नाही. ऑगस्ट महिन्यात पाऊस कमीच राहण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम कापूस पिकावर होऊ शकतो. त्यातच देशात सणांमुळे कापसाला मागणी येत आहे.
सणांमध्ये कपड्यांना चांगली मागणी असते. ती पूर्ण करण्यासाठी व्यवहार वाढत आहेत. त्यामुळे कापूस दरात क्विंटलमागं ३०० ते ५०० रुपयांनी दर वाढले. पण आज कापसाची दरपातळी आज ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. चालू महिन्यात दरात चढ उतार दिसू शकतात. पण दरात झालेली ही वाढ टिकेल. तसेच पुढील काळात दराला चांगला आधारही मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.