Tomato Farming
Tomato FarmingAgrowon

Tomato Cultivation : टोमॅटो लागवड अर्ध्यावर ! टोमॅटोचे दर घसरण्याची शक्यता धुसर

Hike in Tomato Price : दोन महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात ६० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो १५० रुपये किलोवर पोहोचला आहे. दुसरीकडे राज्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामात टोमॅटो लागवडीचे क्षेत्र घडले आहे. अशा स्थितीत टोमॅटोचा भाव गडगडण्याची शक्यता कमी आहे.

Tomato Farming : गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या दराने १०० ते १५० रुपयांची सीमाच ओलांडली आहे. मे महिन्यात १५ रुपये किलो मिळणाऱ्या टोमॅटो सर्वसामान्यांना खरेदी करणे अवघड झाले आहे. मात्र, काही दिवसांत त्याचे दर आवाक्यात येईल, अशी अपेक्षा आहे. परंतु कृषी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. त्याला कारण म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीपात टोमॅटोची लागवड सुमारे ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारात पुरवठा होणार नसल्याने दर नियंत्रणात येण्याची अनिश्चितता आहे.

Tomato Farming
Tomato Rate Control : टोमॅटो दर नियंत्रणासाठी सरकारच्या हालचारी सुरू ; कृषी आयुक्तांकडून बैठक

टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने शासनाने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. भाव नियंत्रणासाठी नाफेडच्या माध्यमातून टोमॅटोची खरेदी करुन काही राज्यात कमी दरात विक्री सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी पुरवठा वाढल्यास दर नियंत्रणात येतील, अशी अपेक्षा शासनाला होती. परंतु कृषी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार पुढील काही महिन्यांमध्ये टाॅमेटोचा पुरवठा वाढण्याची शक्यता कमी आहे.

यामध्ये राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४२ हजार हेक्टर, रब्बी आणि उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्र असते. परंतु यंदा माॅन्सूनला उशीरा झाला. त्यामुळे कडक उन्हाचा पिकांवर परिणाम झाल्याने बाजारात आवक वाढली. एप्रिल महिन्यात किलोला ५-६ रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी बागा सोडल्या.

राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे पाण्याची उपलब्धता नसल्याने यंदा शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रमाणात टोमॅटो रोपांचे बुकिंग झाले नाही. गतवर्षीच्या तुलनेत ५० ते ५५ टक्केच मागणी आहे. त्यामुळे यंदा लागवडीचे क्षेत्र घटल्याने टोमॅटोची आवक वाढण्याची शक्यता कमी आहे.
डॉ. यशवंत जगदाळे, भाजीपाला गुणवत्ता केंद्र प्रमुख , कृषी विज्ञान केंद्र, बारामती
Tomato Farming
Vegetable Market Rate : टोमॅटो, मिरचीच्या दरात दुप्पटीने वाढ, पाणी टंचाईने फळभाज्या वाळण्याचा धोका

त्यात जुलै महिन्यातही अपेक्षित पाऊस झाला नाही. पाण्याची पातळी खालवल्याने शेतकरी टोमॅटोची नवीन लागवड करण्यास धजावले नाहीत. त्यामुळे राज्यभरात जुलैअखेरपर्यंत फक्त २१ हजार ५८१ हेक्टरवर लागवड झाली आहे. ही लागवड गतवर्षीच्या सरासरीपेक्षा ५० टक्के कमी आहे. सर्वाधिक टोमॅटो उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक विभागात ११ हजार १२३, पुणे विभागात ३,९७८ लागवड झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये २ हजार ३७८, अमरावतीमध्ये ६५०, कोल्हापूर विभागात ४०४ आणि नागपूर विभागात २८३ हेक्टर लागवड झाली आहे.

तसेच हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. इतर ठिकाणी नवीन लागवडच कमी झाल्याने बाजारात आवक घटणार आहे. त्यामुळे टोमॅटोच्या घाऊक दरात वाढ होऊन त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवरही होणार असल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे टोमॅटोचे किरकोळ भाव वाढू शकतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com