Market Bulletin: मक्याचा भाव दबावातचदेशातील बाजारात मक्याच्या भावात काहीसे चढ उतार सुरु असले तरी राज्यात मात्र भाव दबावातच आहेत. राज्यात मक्याचा सरासरी भाव १ हजार ५०० ते हजार ८०० रुपये आहे. ओलावा जास्त असलेल्या मक्याचा भाव मात्र १४०० रुपयांपासून सुरु होत आहे. तर एफएक्यू दर्जाचा मका १७०० ते २ हजाराने विकला जात आहे. मक्याची बाजारातील आवक चांगली सुरु आहे. त्यातच मालातील ओलावा आता कमी येत असल्याने किमान भावपातळीत सुधारणा दिसत आहे. मात्र कमाल भाव स्थिर आहेत. बाजारातील मक्याची आवक पुढील काळातही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरसरी दरपातळीही स्थिर दिसू शकते, अशा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .सोयाबीन भाव स्थिरसोयाबीनचे भाव कालच्या पातळीवर स्थिर होते. बाजारातील आवक मात्र काहीशी अधिक होती. बाजारात सोयाबीनचा भाव ३ हजार ९०० ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. बियाणे दर्जाचा माल उच्चांकी दराने विकला जात आहे. मात्र अशा मालाची आवक बाजारात खूपच कमी आहे. दुसरीकडे प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भावही ४ हजार ६५० ते ४ हजार ७५० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. सरकारने हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी सुरु केली. तर खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळत आहे. सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस या पातळीच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..Soybean Procurement: बीड जिल्ह्यातील २३ केंद्रांवर होणार सोयाबीनची खरेदी.कापूस दर टिकूनदेशातील बाजारात कापसाची आवक हळूहळू वाढत आहे. तर दुसरीकडे आयात सुरु आहे. याचा दबाव बाजारावर आहे. आयात वाढत असतानाही बाजारभाव स्थिर दिसत आहेत. देशातील घटलेले उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण कापसाची कमी उपलब्धता यामुळे बाजारात भाव स्थिर आहेत. सध्या कापूस बाजारात सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपये दर मिळत आहे. तर सीसीआयची खरेदी हमीभावाने सुरु झाली आहे. परंतु पावसाने गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणात कापसाची गुणवत्ता कमी झाली आहे. सध्या बाजारात येणाऱ्या कापसात गुणवत्तापूर्ण माल कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. यामुळे कापसाचा भाव आयात सुरु असतानाही स्थिर दिसत आहेत. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..Bedana Trade: बेदाण्याचे सौदे आजपासून सुरू होणार.हरभरा दबावातचदेशातील बाजारात हरभऱ्याचे भाव सध्या दबावातच आहेत. हरभरा अगदी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयाने विकला जात आहे. दुसरीकडे बाजारातील आवकही कमीच आहे. पण आयातीमुळे दरावर दबाव आहे. सरकारने हरभरा आयातीवर १० टक्के शुल्क लावले तर वाटाणा आयातीवर ३० टक्के शुल्क आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाल्याने आयात शुल्क लावूनही आयात सुरुच आहे. आयातीमुळे देशात हरभऱ्याचा साठा तयार झाला. यामुळे बाजारातील आवक कमी असूनही दरावर दबाव आहे. हरभरा बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस पाहायला मिळू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला..हिरवी मिरची टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून हिरव्या मिरचीचे दर टिकून आहेत. पावसामुळे हिरव्या मिरची पिकाला फटका बसला होता. त्यामुळे मिरचीची आवक सुधारत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे. त्यामुळे हिरव्या मिरीचीची सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजाराने विकली जात आहे. हिरव्या मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या बाजारावर परिणाम दिसू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.