
Amaravati News : राजकीय उलथापालथीनंतर काहीशा शांत होणाऱ्या बांगलादेशकडून हिरव्या मिरचीच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात हिरव्या मिरचीच्या दरात चांगलीच सुधारणा झाली असून पहिल्यांदाच दर ७००० ते ७२०० रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती व्यापारी मुन्ना चांडक यांनी दिली.
अमरावती जिल्ह्यातील राजूरा बाजार हिरव्या मिरचीच्या उलाढालीसाठी राज्यात ओळखला जातो. दिवसा मिरचीचा तोडा केल्यानंतर सायंकाळपासून शेतकरी या बाजारात मिरची विक्रीसाठी आणतात. सायंकाळी सात ते रात्री एक अशी या बाजाराची वेळ आहे. विशेष म्हणजे हा बाजार हंगामी राहतो. अशाप्रकारची अनेक वैशिष्ट्ये जपणाऱ्या या बाजारातून बांगलादेशी व्यापारी स्वतः येत थेट मिरची खरेदी करतात.
नजीकच्या काळात बांगलादेशमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकार विरोधात उठाव झाला होता. त्यामुळे भारतीय शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. प्रशासनिक सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा आयातीला परवानगी देण्यात आली. त्यामध्ये राजूरा बाजार येथील हिरव्या मिरचीचादेखील समावेश आहे.
राजूरा बाजारात रोज सरासरी २०० क्विंटलपर्यंत हिरव्या मिरचीची आवक होते. १५ टन प्रतिगाडी याप्रमाणे १० गाड्या म्हणजेच सुमारे ३०० टनांपर्यंत रोज हिरवी मिरची बांगलादेशमध्ये निर्यात होत असल्याचे व्यापारी मुन्ना चांडक यांनी सांगितले. दिवाळीनंतरच्या काळात बांगलादेशमधील स्थानिक मिरचीची आवक बाजारात होण्यास सुरुवात होते. त्यानंतर भारतीय मिरचीची मागणी काहीशी कमी होत असल्याने दर दबावात येतात, असेही त्यांनी सांगितले. बांगलादेबरोबरच वाशी, कोलकात्ता, रायपूर, लखनऊ या भागांतही हिरव्या मिरचीचा पुरवठा येथून होतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.