Food Grains Import : कडधान्य आयात दुप्पट; शेतकऱ्यांवर संकट शक्य

Grains Market : भारताने तूर, हरभरा, मसूर, उडीद आणि पिवळा वाटाणा या कडधान्य आयातीवरील शुल्क काढले. त्यामुळे देशात आयात वाढत आहे.
Food Grains
Food GrainsAgrowon

Pune News : भारताने तूर, हरभरा, मसूर, उडीद आणि पिवळा वाटाणा या कडधान्य आयातीवरील शुल्क काढले. त्यामुळे देशात आयात वाढत आहे. कडधान्ये आयात जवळपास दुप्पट झाली. सध्या कडधान्याची टंचाई असल्याने हा निर्णय गरजेचा वाटत असला, तरी आयातीमुळे साठे निर्माण होऊन देशातील कडधान्ये उत्पादकांना याचा फटका बसू शकतो.

देशातील वाढती मागणी, घटलेले उत्पादन आणि सरकारची धोरणे यामुळे देशात कडधान्यांची आयात वाढत आहे. देशात पुरवठा वाढविण्यासाठी सरकारने काही कडधान्यावरील आयातशुल्क काढले आहे. त्यात तूर, उडीद, मसूर, पिवळा वाटाणा आणि देशी हरभऱ्याचा समावेश आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ मध्ये कडधान्य आयात जवळपास दुप्पट झाली.

Food Grains
Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

मागील वर्षापर्यंत भारत विशेष करून मसूर, तूर आणि उडदाची आयात करत आला. ही आयात प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, कॅनडा, म्यानमार, मोझांबिक, टांझानिया सुदान आणि मालावी या देशांमधून होत आली. भारताने डिसेंबर २०२३ मध्ये हरभऱ्याला पर्याय ठरणाऱ्या पिवळा वाटाण्यावरील आयात शुल्कही काढले आहे.

भारताने २०१६ मध्ये कडधान्य आयातीचे पंचवार्षिक करार काही देशांसोबत केले होते. त्यात मोझांबिकसोबत वर्षाला २ लाख टन आयातीचा करार आहे. त्याला २०२१ मध्ये आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. २०२१ मध्ये भारताने मालावीसोबत ५० हजार टन तूर आयातीचा पंचवार्षिक करार केला. तसेच म्यानमारसोबत २०२६ पर्यंत वर्षाला १ लाख टन तूर आणि २.५० लाख टन उडीद आयातीचे करार केले.

Food Grains
Food Grain Storage : शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्याचे फायदे

भारत आता ब्राझीलसोबत दीर्घकाळापासून कडधान्यांसाठी चर्चा करत आहे. दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्यातून ब्राझीलमधील उडीद लागवड आणि निर्यात ठळकपणे वाढलेली दिसेल, असे ब्राझीलच्या निर्यातदारांनी सांगितले. ब्राझीलसोबतच कडधान्यांसाठी अर्जेंटिनासोबतही अनेकदा चर्चा झाली.

हरभऱ्यावरील आयात शुल्क काढले

देशात हरभरा उत्पादन वाढावे, यासाठी केंद्र सरकारने हरभरा आयातीवर एकूण ६६ टक्के आयात शुल्क लागू केले होते. तर पिवळा वाटाणा आयातीवरील शुल्क ५० टक्के करण्यात आले होते. पण निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारने आयात शुल्क काढले.

इतर देशांना फायदा

भारताने महत्त्वाच्या तूर, हरभरा, मसूर, उडीद आणि पिवळा वाटाणा या ५ कडधान्य पिकांवरील आयात शुल्क काढले. यामुळे निर्यातदार देशांना भारतात निर्यातीची संधी मिळाली. तसेच चांगला भावही मिळत आहे. देशी हरभऱ्यावरील आयात शुल्क काढल्याने इतर देशांना हरभरा लागवडीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे, असे आयातदारांनी सांगितले.

कडधान्य आयात

४६.५ लाख टन
२०२३-२४
....
२५.३ लाख टन
२०२२-२३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com