
Amaravati News : हमीभावाने सोयाबीन विक्री करिता सात जानेवारीला नोंदणी केल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना खरेदीच्या शेवटच्या दिवशी हमीभाव केंद्रावर आपला माल आणण्याचे एसएमएस प्राप्त झाले. त्यामुळे एकाचवेळी शेकडो शेतकऱ्यांनी अमरावती बाजार समितीमधील केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणल्याने एकच गोंधळ उडाला.
केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात सोयाबीनला ४८९२ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर होणारी आयात आणि प्रक्रिया उद्योगांच्या मागणीचा अभाव या कारणामुळे खुल्या बाजारात सोयाबीनचे दर चार हजार रुपयांच्या पुढे गेले नाही. परिणामी शासकीय केंद्रावर सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांचा भर राहिला. याकरिता शेतकऱ्यांना नोंदणी सक्तीची करण्यात आली होती.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपला माल हमीभाव केंद्रावर आणावा, असे अपेक्षित होते. अमरावती जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी एक जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत नोंदणी केली होती. महिन्याच्या सुरुवातीला नोंदणी केलेल्या या शेतकऱ्यांना खरेदीच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. ३१) शेतमाल हमीभाव केंद्रावर आणण्याचे एसएमएस प्राप्त झाले.
एसएमएस प्राप्त होतात शेकडो शेतकऱ्यांनी एकाच वेळी मिळेल त्या वाहनाने बाजार समितीमध्ये आपला माल आणला. त्यामुळे बाजार समितीमधील सर्व शेड शेतकऱ्यांच्या सोयाबीनमुळे फुल झाले होते. त्याच वेळी शासकीय हमीभाव केंद्रावर खरेदी संदर्भाने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘नाफेड’कडून एकाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
परिणामी संपूर्ण खरेदी प्रक्रियेला बराच विलंब होत होता. त्यामुळे रांगेत ताटकळत आणि संयम सुटलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केला. या कारणामुळे या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग घडत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.