Chilli Market: लाल मिरचीला भाव मिळेना; महिनाभरात भाव पुन्हा २ ते ४ हजाराने कमी झाले

Chilli Price Drop: लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली असून मागील वर्षभरातच भाव ४० टक्के कमी झाले आहेत. सध्या मिरचीचे दर प्रतिक्विंटल १० ते १२ हजारांच्या दरम्यान आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. तेलंगणातील शेतकरी आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.
Red Chilli
Red ChilliAgrowon
Published on
Updated on

Pune News: देशातील बाजारात मिरचीचे भाव कमी झाले आहेत. मागील वर्षभरात लाल मिरचीचे भाव ४० टक्क्यांनी कमी झाले. सध्या महत्वाच्या मिरची उत्पादक राज्यांमध्ये मिरचीला प्रतिक्विंटल १२ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. भाव कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

देशातील बाजारात मिरचीच्या भावात मागील वर्षात चांगली तेजी होती. २०२३ मध्ये मिरचीचा भाव २५ हजारांपर्यंत पोचला होता. कारण कमी पावसामुळे देशातील मिरची उत्पादन कमी झाले होते. मागणी मात्र कायम होती. त्यामुळे दरात चांगली तेजी आली. मिरच्याचे भाव विक्रमी पातळीवर पोचले होते. पण देशातील मिरची लागवड २०२४ मध्ये वाढली. तसेच मिरचीसाठी पोषक वातावरण होते. त्यामुळे उत्पादन वाढीचा अंदाज आधीपासूनच देण्यात आला. त्यानंतर भाव कमी होत गेले. जानेवारी २०२४ मध्ये मिरचीचा भाव १९ हजारांवर पोचला होता.

Red Chilli
Chilli Rate : मिरचीच्या भावात ३५ टक्क्यांची घट

जागतिक पातळीवर ५५ ते ६० लाख टनांच्या दरम्यान मिरची उत्पादन होत असते. त्यापैकी भारत जवळपास निम्मे उत्पादन घेतले जाते. देशात मागील हंगामात २८ लाख टन मिरची उत्पादन झाले होते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मागील काही वर्षात भाव मिळत नसल्याने या दोन्ही राज्यातील मिरची लागवड कमी होत आहे. तरीही शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. इतर राज्यातील मिरचीच्या दरावरही परिणाम झाला आहे.

Red Chilli
Red Chilli Rate: लाल मिरचीच्या दरात ३५ टक्क्यांपर्यंत घट; खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

बाजारात मिरचीचे भाव एका वर्षातच १० ते १२ हजार रुपयांवर आले. उत्पादन वाढीचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. जानेवारी २०२५ मध्ये लाल मिरचीचे भाव १४ हजार रुपयांवर होते. तो भाव आता १० ते १२ हजारांवर आले. म्हणजेच गेल्या महिन्याभरातच मिरचीचे भाव जवळपास २ हजार ते ४ हजाराने कमी झाले. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

तेलंगणात लाल मिरचीचे उत्पादन चांगले होते. मागील काही वर्षांपासून भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. मात्र तरीही मिरचीला भाव मिळत नाही. यंदा तर भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी झाले आहेत. यामुळे तेलंगणातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. तेलंगणातील मिरची उत्पादक भागात शेतकऱ्यांमध्ये सध्या रोष दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com