
Solapur News : लम्पी आजारामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर जनावरे दगावल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता. ९) ५७ गोवर्गीय जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मृत जनावरांच्या मालकांकडून केली जात आहे.
यंदा जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाळ्याला सुरवात झाली. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली; मात्र लवकर झालेल्या पावसाने वाढलेली दलदल व माशा, डासांमुळे जिल्ह्यात लम्पीची साथ पसरली.
आतापर्यंत जिल्ह्यात एक हजार ९६५ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, त्यापैकी एक हजार ४६७ जनावरे बरी झाली आहेत. मात्र, ५७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. दूध, शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने अडचणीत असलेल्या शेतकरी पशुपालकांची जनावरे आजारी पडून दगावत आहेत.
२०२२ मध्ये मदतीमुळे दिलासा
वर्ष २०२२ मध्येही राज्यात लम्पीची साथ पसरली होती. तेव्हा मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली होती. ती संख्या एकेका जिल्ह्यात शेकड्याने होती. सरकारने लम्पीमुळे मृत्यू झालेल्या दुधाळ गायीला ३० हजार, बैलासाठी २५ हजार तर वासराला १६ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.