Weather Agrowon
हवामान

Weather Update | किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

Dhananjay Sanap

Pune News : राज्यातील किमान तापमान काहीशी वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामान किमान तापमानातील चढ-उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मागील २४ तासात राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कोकण आणि उर्वरित भागात किमान तापमानात वाढ झाली. तर नलिया येथे सर्वात कमी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तरप्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागात किमान तापमान ७ ते १० अंश सेल्सियसच्या दरम्यान होतं. तर दिल्ली, दक्षिण राजस्थान आणि मध्यप्रदेशमधील किमान तापमानात वाढ नोंदवली गेली.

तसेच देशातील बहुतांश भागात धुक्याची चादर पसरली होती. तसेच पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि झारखंडच्या काही भागात किमान तापमानात २ अंश सेल्सिअस ते ४ अंश सेल्सिअसची वाढ झाली होती.

राज्यात कोरड्या हवामानासह पुढील पाच दिवस किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT