Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Alert: कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज; राज्यातील कमाल तापमानाचा पारा पुन्हा ३८ अंशाच्या पार पोचला

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात तापमान पुन्हा वाढताना दिसत आहे. विदर्भात उन्हाचा तडाखा कायम असून काही भागांत ३८ अंशांवर तापमान पोहोचले आहे. हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील तापमानात आज पुन्हा काहीशी वाढ झाली होती. तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही दमट आणि उष्ण हवामानाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट कायम आहे. तर दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामानाच अंदाज असून कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

विदर्भातील उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भातील बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३७ अंशाच्या पुढे होता. तसेच मध्य महाराष्ट्रातही आज तापमानात वाढ दिसून आली. आज सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३८.९ अंश सेल्सिअस तापमान होते.

राज्यात दिवस रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच परभणी, जेऊर, अकोला, चंद्रपूर येथे तापमान ३८ अंशाच्या पुढे गेले. तर यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, ब्रम्हपुरी, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे ३७ अंशावर तापमानाची नोंद झाली. 

याशिवाय आजही कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमट आणि उष्ण हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला होता. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT