Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पूर्व मोसमी पावसाचा जोर वाढणार; राज्यभरात पुढील ५ दिवस ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाली. हवामान विभागाने आजपासून पुढील ५ दिवस काही भागात वादळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडाला आणि गोंदीया तसेच वाशीम जिल्ह्यात काही भागात विजा आणि गारपीटीसह वादळी पावसाचा अंदाज दिला. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

खानदेशातील धुळे आणि नंदूरबार तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच कोकणातही काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. 

रविवारी मात्र पावसाचा जोर संपूर्ण राज्यात वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर पुणे, सातारा, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. सोमवारीही राज्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT