Winter Weather Agrowon
हवामान

Hawaman Andaj : पुढील आठवडाभर थंडी कायम राहणार; राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचीही शक्यता

Weather News : राज्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली. त्यामुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे. बहुतांशी भागात तापमानाचा पारा १५ ते १६ अंशाच्या दरम्यान आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली. त्यामुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे. बहुतांशी भागात तापमानाचा पारा १५ ते १६ अंशाच्या दरम्यान आहे. पुढील आठवडाभर राज्याच्या किमान आणि कमाल तापमानातील घट कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. 

राज्याच्या बहुतांशी भागात रविवारपासून थंडीत हळूहळू वाढ होत आहे. थंडीतील वाढ आणखी आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज आहे, असेही खुळे यांनी स्पष्ट केले. आजपासून पुढील आठवडाभर महाराष्ट्रात थंडीसाठी अटकाव करणारे कोणतेही वातावरण नाही.

या आठवड्यात आकाश निरभ्र राहून व पंजाब हरियाणा व राजस्थान दरम्यान असणाऱ्या हवेच्या उच्चं दाब क्षेत्रामुळे ईशान्यकडून महाराष्ट्राकडे लोटल्या जाणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रात सकाळ-संध्याकाळी येत्या आठवड्यात थंडीत अजून अधिक वाढ होण्याची शक्यता जाणवते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

सध्या संपूर्ण कोकणात व दक्षिण महाराष्ट्रातील  दक्षिण नगर, सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १२ जिल्ह्यांत दुपारचे कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे. पहाटेचे किमान तापमान मात्र संपूर्ण महाराष्ट्रात  १४ ते १५ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे.

ही दोन्हीही कमाल व किमान तापमाने हे जवळपास सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्रीने अंशाने खालावलेली आहेत. तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर अश्या ९ जिल्ह्यांत मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंशाने कमी झाल्याचे जाणवत आहे. 

मंगळवार म्हणजेच २६ नोव्हेंबरनंतर थंडीतील सातत्य टिकून राहण्याची शक्यता आहे. तरी त्या दरम्यान बंगालच्या उपसागरात हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्राची शक्यता आहे. या शक्यतेमुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या ४ दिवसात म्हणजे २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड अश्या ९ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे या ९ जिल्ह्यात ४ दिवसात म्हणजे २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान थंडीला काहीसा विराम मिळेल.  उर्वरित २७ जिल्ह्यात मात्र थंडीवर विशेष परिणाम जाणवणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT