Agriculture Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Cold : बहुतांशी भागात थंडी कायम ; थंडीत चढ उतार कायम राहण्याचा अंदाज

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागांमध्ये आजही किमान तापमानात वाढ झाली. तर उत्तर भारतात थंडीचे प्रमाण कायम दिसते. राज्यातील किमान तापमानात पुढील काही दिवसांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पाचही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उत्तर भारतात किमान तापमान मागील दोन दिवसांपासून एकाच पातळीवर दिसते. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि झारखंडमधील बहुतांशी भागात किमान तापमान ८ अंश सेल्सिअस ते १२ अंश सेल्सिअसरच्या दरम्यान होते.

तर पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि झारखंडच्या काही भागात किमान तापमानात २ अंश सेल्सिअस ते ४ अंश सेल्सिअसची वाढ झाली होती. तर काही भागात दाट धुक्याची चादरही दिसून आली. 

राज्यातही काही भागात किमान तापमानात वाढ झाली आहे. सकाळी वातावरणात थंडी कायम आहे. पण पुढील काही दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT