Water percolation in soil: मातीच्या भौतिक गुणधर्मांमध्ये कणांची रचना आणि सच्छिद्रता फार महत्त्वाची भूमिका बजावतात. ही सच्छिद्रता कमी झाली, की पाणी मातीमध्ये मुरत नाही आणि शेतीसाठी आवश्यक आर्द्रता टिकत नाही. सध्या अनेक शेतांमध्ये माती घट्ट, चिकट आणि कठीण झाली आहे. यामुळे पाण्याचे झिरपणे कमी झाले असून, पीक मुळांपर्यंत पोहोचत नाही. मातीतील सच्छिद्रता कमी होण्यामागे वाढलेले क्षारांचे प्रमाण एक महत्त्वाचे कारण आहे. हे क्षार सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या साचलेल्या पाण्यामुळे किंवा रासायनिक खतांच्या अत्यधिक वापरामुळे वाढतात. त्यामुळे मातीची रचना भुसभुसीत न राहता कठीण होते. अशा परिस्थितीत पाणी मातीत मुरण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे शेतीतील उत्पादनही घटते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.