Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : अमरावतीतील पाच तालुके पीकविम्यातून वगळले

पंतप्रधान पीकविमा योजनेतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा परतावा देण्यात येत असला तरी ६९ हजार ९४५ शेतकऱ्यांपैकी केवळ १३ हजार ७६२ शेतकऱ्यांनाच परतावा मिळाला आहे.

टीम ॲग्रोवन

अमरावती : पंतप्रधान पीकविमा योजनेतील (Crop Insurance Scheme) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा परतावा (Insurance Compensation) देण्यात येत असला तरी ६९ हजार ९४५ शेतकऱ्यांपैकी केवळ १३ हजार ७६२ शेतकऱ्यांनाच परतावा मिळाला आहे. तर, जिल्ह्यातील ९४ शेतकऱ्यांना एक हजार रुपयांच्या आत विमा परतावा देण्यात आला आहे. भरलेल्या प्रीमियमइतकीही रक्कम या शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांना विमा नाकारण्यात आल्याने शेतकऱ्यांत संताप आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देण्याची तरतूद असलेल्या विमा योजनेत शेतकऱ्यांच्या परताव्यातही नुकसानच झाले आहे. खरीप हंगामात नुकसान झाल्याने जिल्ह्यातून १ लाख १५ हजार ४११ शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्यात.

त्यापैकी १ लाख ८ हजार ६५ पूर्वसूचनांचे सर्वेक्षण करण्यात आले. ७३४६ पूर्वसूचनांचे सर्वेक्षण प्रलंबित आहे. एकूण प्रकरणांपैकी ६९ हजार ९४५ शेतकऱ्यांना ६६ कोटी ३१ लाख रुपयांचा परतावा मंजूर करण्यात आला. परतावा मंजूर करताना अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगावसुर्जी, धारणी व चिखलदरा हे पाच तालुके वगळण्यात आले आहेत.

अडीच महिन्यांनंतर कंपनीने परतावा देण्यास सुरुवात केली असून, ६९ हजार ९४५ शेतकऱ्यांपैकी १३ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या खात्यात परताव्याची रक्कम जमा करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांना १६ कोटी ४३ लाख ९३ हजार रुपये मिळतील. तर, ९४ शेतकऱ्यांना ५७ हजार रुपये परतावा देण्यात आला आहे. यामध्ये एक हजार रुपयांपेक्षाही कमी रकमेचा परतावा देण्यात येत आहे.

यामुळे कंपनीच्या कारभाराविरोधात असंतोष निर्माण होऊ लागला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांना वगळण्यात शेतकरी संतप्त झाले आहेत. दाखल एकूण पूर्वसूचनांपैकी २२ हजार ७३३ शेतकऱ्यांना परताव्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांच्या सूचनांवर सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व कृषी आयुक्तांनी दिले असले तरी कंपनीने नकार कायम ठेवला आहे.

नऊ तालुक्यांतील शेतकऱ्यांनाच परतावा

जिल्ह्यातील चौदापैकी नऊ तालुक्यांतील शेतकऱ्यांनाच विमा परतावा मिळाला आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे ४२५०, दर्यापूर ८५६, चांदूररेल्वे ८१०८, वरुड १४४२, तिवसा ६३०३, नांदगाव खंडेश्वर २५,९४९, मोर्शी ५६८८, भातकुली ६२८१ व अमरावती येथील ७४३१ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Flour Export : केंद्र सरकार सेंद्रिय गव्हाच्या पीठ निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता

Bihar Government Formation: पुन्हा तेच त्रिकूट! बिहारचा मुख्यमंत्री ठरला; NDA सरकारमध्ये असणार दोन उपमुख्यमंत्री

Cotton Production Issue: कारंजा तालुक्यात कपाशीची दोन वेचणीतच उलंगवाडी

Local Body Polls: निवडणुकीत नेत्यांचा नातेवाईकांवरच विश्वास

Agriculture Storage: साठवणुकीत तापमान आणि आर्द्रता का महत्त्वाची?

SCROLL FOR NEXT