Water Conservation
Water Conservation Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Water Conservation : जलसंधारणाची ‘बार्शीत सरशी’

टीम ॲग्रोवन

बार्शी : दुष्काळीचा (Drought) कलंक असलेल्या बार्शी तालुक्यासाठी उजनी धरणाचे (Ujani Dam) पाणी योजना (Water Scheme) पूर्णत्वास न गेल्याने जणू मृगजळ ठरले. मात्र मागील पाच वर्षांत या तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची (Jalyukt Shiwar Scheme) तब्बल ३० कोटींच्या निधीची कामे झाली.

यातून पाणी अडण्याचे अनेक प्रकल्प झाले. त्यामुळे पाण्याच्या स्त्रोतांमधे पाणी आले, ज्यावर बागायती पिके बहरत आहेत. ज्या पिकांमधून शेतकऱ्यांच्या जीवात समृध्दी आली आहे. साधारण ३ हजार ३० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल आहे. उजनी प्रकल्पाने नव्हे, तर जलयुक्त शिवार योजनेच्या प्रकल्पांमुळे या तालुक्याच्या अनेक भागात जणू हरितक्रांतीची पहाट उगवली आहे.

जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उभे राहिले आहेत. ते आनंदाने उदरनिर्वाह करीत आहेत. या योजनेचा कसा फायदा झाला, या संदर्भातील मते ‘सकाळ’शी बोलताना अनेक शेतकऱ्यांनी मांडली. तूर, सोयाबीन अशा पारंपारिक पिकांना बगल देत, ऊस, द्राक्ष, लिंबू, केळी याह अन्य नगदी पिके शेतकऱ्यांकडून घेतली जात आहेत. त्यातून शेतकऱ्यांच्या हातात चांगला पैसा खेळत आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण वाढले आहे.

गावागावांमध्ये शिवार फेरी झाली,पाझर तलाव, बंधारे आराखडा, गावाच्या पाण्याचे आराखडे तयार झाले,ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली, कामाच्या अंदाजपत्रकांची तालुका, जिल्हास्तरीय शासकीय यंत्रणांकडून मंजुरी मिळाली ई-निविदा पद्धतीने कामाचे वाटप झाले.

३ लाखांपासून २५ लाखांपर्यंत कामांचे वाटप झाले. या योजनेत मागील पाच वर्षांत सुमारे ३० कोटी रुपये बार्शी तालुक्यात खर्च झाले आहेत खर्च झालेल्या पैशाचा दुरुपयोग झाला नाही त्याचा फायदाच झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT