Banana Crop Insurance
Banana Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Banana Crop Insurance : ‘फळ पीकविमा’तून भरपाईची केळी उत्पादकांना प्रतीक्षा

टीम ॲग्रोवन

जळगाव, अकोला ः जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये फळ पीकविमा योजनेत (Fruit Crop Insurance) सहभागी झालेल्या केळी उत्पादकांना (Banana Growers) अद्यापही वादळ, गारपिटीत नुकसानीसंबंधीची भरपाई (Crop Damage Compensation) मिळाली नसल्याची स्थिती आहे. यामुळे केळी उत्पादकांत शासनाबाबत नाराजी वाढली आहे.

जिल्ह्यातील ४९ हजार केळी उत्पादक हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२१-२२ मध्ये सहभागी झाले होते. ५३ हजार हेक्टरवरील केळी पिकासाठी या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले होते. नोव्हेंबर ते जुलै या नऊ महिन्यांसाठी केळी पिकाला थंडी, अधिक तापमान, वादळ (वेगाचा वारा), गारपीट या हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळते.

विमा संरक्षण कालावधीत रावेर, यावल, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव, पाचोरा या तालुक्यांत वादळ व गारपीट झाली. यासंबंधी सूचना दिल्यानंतर पंचनामे झाले. विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर २१ दिवसांत परतावे देण्याचे या योजनेत निर्देशित आहे. शासन व विमा कंपनीने थंडी व उष्णता यात नुकसानीसंबंधी परतावे वेळेत दिले. परंतु संरक्षण कालावधी संपून दोन महिने झाले तरीही केळी उत्पादकांना भरपाई मिळालेली नाही.

या बाबत खासदार उन्मेष पाटील, रघुनाथदादाप्रणीत शेतकरी संघटनेचे विभाग अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किरण गुर्जर, चोपडा तालुक्याचे उपाध्यक्षा कविता पाटील, सरचिटणीस विनोद धनगर यांनी मागणी केली. परंतु अद्यापही प्रशासन, शासन, तसेच विमा कंपनीने दखल घेतलेली नाही. शेतकरी अडचणीत आहेत. कारण अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी आदी पिकांची हानी झाली आहे. तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

अकोल्यातील पणज मंडलही भरपाईपासून वंचित

अकोला जिल्ह्यातील पणज मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी देखील केळीच्या नुकसानीची फळ पीकविमा भरपाई मिळवून देण्याची मागणी कृषी आयुक्तांकडे केली आहे. जवळपास ४०० केळी उत्पादक भरपाईची प्रतीक्षा करीत आहेत.

या बाबत विकास देशमुख, रेवती देशमुख, विजय देशमुख, शिला देशमुख यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी निवेदन पाठविले आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांनी २०२१-२२ मध्ये केळी पिकाचा पीकविमा काढला होता. दरम्यान वादळ, गारपिटीने केळीचे नुकसान झाले होते. नुकसानीचे दावेही मंजूर झाले आहेत. मात्र अजूनही कंपनीने भरपाई दिलेली नाही. ही भरपाई लवकर द्यावी, असे निवेदनात नमूद आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT