Latest Update on Dam Water Levels: आधीच उशिरा सुरू झालेल्या मॉन्सूनचा जोर जुलैमध्ये कमी झाल्याने उगवण झालेल्या खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर पेरण्या आणखी रखडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रमुख धरणांत एकूण केवळ ३०.३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आतापर्यंत सरासरीच्या१७ टक्केच पाऊस जिल्ह्यात झालेला असल्याने मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत.
यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी दिसत आहे. जूनच्या शेवटी पावसाने सुरुवात केली आहे. सध्या ऐन जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिली आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील ३० टक्के पेरण्यापूर्ण झाल्या आहेत. सध्या पाऊस थांबल्याने शेतकरी उर्वरित पेरणी करण्यास तयार नाहीत.
मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत सध्या शेतकरी आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यात भात, तसेच सोयाबीन, भुईमूग, या पिकांची पेरण्या सुरू आहेत. पण पावसाचा जोर कमी झाल्याने पेरणीवाया जाण्याची भीती शेतकऱ्यांत आहे. तर मागील काही दिवसांत पेरणी केलेल्या सोयाबीनची चांगली उगवण झाली आहे. पावसाचा जोरच कमी झाल्याने या पिकांच्या वाढीवर परिणाम होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.