
Satara News : मॉन्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. जलाशयात फक्त १०.७७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, गुरुवार (ता. २२) पासून पायथा वीजगृहातून होणारा एक हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
पावसाचे आगमन झाले नाही तर कोयना आणि कृष्णा नदीच्या काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
आजपर्यंत कोयनानगर येथे ७७ मिलिमीटर, नवजाला ८८ मिलिमीटर व महाबळेश्वरला १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
धरणात १०.७७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, उपयुक्त पाणीसाठा फक्त ५.८८ टीएमसी आहे. पाऊस पडेल अशी परिस्थिती दिसून येत नाही.
त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने आजपासून पूर्वेकडे सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येणारा व सुरू असलेला एक हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद केलेला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.