शेतकरीप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. १८) जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयावर काढलेल्या ‘दणका मोर्चा’त हजारो शेतकरी उपस्थित होते.
शेतकरीप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. १८) जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयावर काढलेल्या ‘दणका मोर्चा’त हजारो शेतकरी उपस्थित होते. 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांनो पक्षभेद विसरून एकत्र या : तुपकर

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः भाजपचे अध्यक्ष अमित शहा व इतर नेते सिनेअभिनेत्यांच्या घरी जातात. मात्र शेतकरी अडचणीत असताना एकही जण त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांंच्या जमिनी काढून त्या उद्योगपतिंना देण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव अाहे. अाज पीककर्ज वाटप करताना बँका शेतकऱ्यांना जागोजागी अाडकाठी अाणत अाहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पक्षभेद विसरून अापल्या हक्कासाठी एकत्र यायला हवे, असे अावाहन स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.  सरसकट कर्जमाफी अाणि पीकविमा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (ता.१८) जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयावर जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा ‘दणका मोर्चा’ काढण्यात अाला. सुरवातीला वरवट-बकाल ते जळगाव जामोद अशी मोटर सायकल रॅली काढण्यात अाली. या मार्गात जागोजागी शेतकऱ्यांनी स्वागत केले. मोर्चा उपविभागीय कार्यालयासमोर पोचल्‍यानंतर तेथे सभा झाली. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, संघटक बबनराव चेके, राणा चंदन यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी तुपकर पुढे म्हणाले, अाज शेतकऱ्यांना पीककर्ज मिळवण्यासाठी दारोदारी भटकावे लागत अाहे. भाजपच्या लोकांनाही पीककर्ज मिळत नसल्याची वस्तुस्थिती असून असून अाज तेच अांदोलने करायला लागले. राज्यात व देशात यांचेच सरकार असताना जर बँका एेकत नसतील तर सर्व सामान्य माणसाने न्याय अाता अमेरिकेच्या ‘ट्रम्प’ कडे मागावा काय, असा प्रश्न केला. अाज शेतकरी गांधीजींच्या शांततावादी मार्गाने या ठिकाणी अाले. या अाठवडाभरात पीककर्ज वाटप न झाल्यास भगतसिंहाच्या मार्गाने (हिंसा) पोचतील, असा इशाराही तुपकर यांनी दिला. तर बँक अधिकाऱ्यांना ठोकून काढा पीक कर्ज मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा ज्या बँकांचे मॅनेजर अपमान करतील त्यांना जागेवर ठोकून काढा, अशी सूचना तुपकर यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना केली. हजारो शेतकऱ्यांचे अर्ज गेल्या हंगामात सर्व्हर लिंक बंद राहल्याने पीकविमा न भरू शकलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज या वेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाकडे पाठवला. या भागातील हजारो शेतकऱ्यांचे अर्जसुद्धा भरून देण्यात अाले अाहेत. मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

  • पीककर्ज सरसकट माफ करा
  • कोणत्याही दाखल्यांचे निकष न लावता नवीन पीककर्ज द्या
  •  विमा न भरलेल्या वंचीत शेतकऱ्यांनाही पीकविम्याची अर्धी रक्कम द्या,
  • पतसंस्था, सावकार व फायनान्सकडून शेतकऱ्यांचा कर्जमाफीत समावेश करा
  • १४० गाव पाणीपुरवठा योजनेचे काम पारदर्शक करून गावांना पाणीपुरवठा करा
  • बोंड अळीची मदत खात्यात जमा करा
  • अाॅगस्ट २०१७ पासूनचे व्याज कोणत्याही बँकेने वसूल करू नये
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT