मुंबई : हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कोरोनाविरुद्धची लढाई सुरूचं ठेवू, हे युद्ध आपल्याला जिंकायचेच आहे. गुढीपाडव्याला महाराष्ट्रात बहर येते, परंतु हे युद्ध जिंकल्यानंतर पुन्हा आनंदाने गुढीपाडवा साजरा करू, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. तसेच कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू बंद होणार नाहीत, त्यामुळे साठा करू नका, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्ताने जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गप्पा मारल्या. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, आज मी तुम्हाला निगेटिव्ह काहीच सांगण्यासाठी आलेलो नाही, मी केवळ शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे.मंगळवारी रात्री थोडी धावपळ झाली, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी गप्पा सुरू केल्या. एकूणच सर्वांना कोरोना व्हायरसच्या गांभीर्याची कल्पना आली आहे. घराबाहेर पडू नका. या संकटाची तुलना मी जागतिक युद्धाशी केली आहे. १९७१चे युद्ध आपण लक्षात ठेवले पाहिजे. शत्रू दिसत नसल्याने हल्ला कुठून होईल माहीत नसते. म्हणून आपण घरात राहिले पाहिजे. घरातून बाहेर पडलो की शत्रू घरात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू, प्राण्यांचे खाद्यपदार्थांचा साठा करू नका, रुग्णालये, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालूच राहतील. ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांची काळजी घेऊ, उद्योजक स्वतःहून पुढे येत आहेत. कंपनी, कारखाने बंद आहेत, त्या उद्योजकांना हातावरचे पोट असणाऱ्यांचे किमान वेतन कापू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.