संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पश्चिम विदर्भातील पाणीपातळीत घट

टीम अॅग्रोवन

अकोला : दरवर्षी घटते प्रमाण तसेच सातत्याने जमिनीतून होत असलेल्या उपशामुळे पाणीपातळीत मोठी घट झाली अाहे. यामुळे असंख्य ठिकाणी जानेवारीपासूनच विहिरींनी तळ गाठून पाणीटंचाईचा इशारा दिला. भूजल सर्वेक्षण यंत्रणांनी जानेवारीत विहिरींचे निरीक्षण नोंदवित पाणीपातळी काढली होती. पश्‍चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात पाणीपातळी घटल्याचे चित्र समोर अाले अाहे.

अमरावती विभागात अकोला जिल्ह्याची सर्वाधिक २.९० मीटरने पाणीपातळीत घट दिसून अाली अाहे. तर तालुक्यांच्या बाबतीत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या तालुक्यात सर्वाधिक ७.१८ मीटर एवढी घट नोंदविली गेली अाहे.

गेल्या काही वर्षांत पावसाची अनियमितता कमालीची वाढली अाहे. पाऊस सलग न पडणे, एकाच दिवशी अधिक पाऊस येणे, दोन पावसात मोठा खंड पडणे असे प्रकार सातत्याने वाढत अाहेत. मोसमात पडणाऱ्या पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर पुरेशी दिसत असली तरी, मागील पाच वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस फारसा झालेला नाही. सोबतच पडणाऱ्या पावसाचे दिवस कमी होत गेले अाहेत. जे पाणी पडते ते वेगाने वाहून जात असल्याने साहजिकच जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे.

अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांत प्रत्येक तालुक्यात विहिरींची पातळी मोजून पातळीत घट किंवा वाढ झाल्याबाबत निरीक्षण नोंदविण्यात अाले होते. त्यानुसार अकोला जिल्हा सरासरी पातळी घटीमध्ये अाघाडीवर दिसून अाला अाहे. या जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात ४.६४ मीटर तर बाळापूर ३.९३, पातून ३.०४, अकोला २.६३, बार्शीटाकळी २.१७, अकोट २.१० तर मूर्तिजापूरमध्ये १.८० मीटर पातळी घट दिसून अाली.

जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने विभागातील पाचही जिल्ह्यांतील सर्वच तालुक्यांत मिळून प्रायोगिक तत्त्वावर सुमारे साडेसहाशे विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २०१३ ते २०१८ ची सरासरी पाणीपातळीची तुलना जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाशी करण्यात अाली. त्यानंतर सरासरी अंदाज समोर अाले. भूजल पातळी घटल्याने हमखास सिंचनाचा पट्टा म्हणून अोळखल्या जाणाऱ्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद ते अचलपूर या भागात पातळीत घट होत असल्याचे विदारक चित्र पुढे अाले.

या विभागात कोणत्याही जिल्ह्यात सरासरी २०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरवेल केले तर पाणी मिळते. मात्र हे पाणीसुद्धा अाता शाश्वत राहिलेले नाही.

जिल्हानिहाय स्थिती (मीटरमध्ये) अकोला (-२.९०) बुलडाणा (०.४३) वाशीम (-१.७७) अमरावती (-१.६४) यवतमाळ (-१.३८)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT