नवी दिल्ली ः गेल्या अाठवड्यात देशातील विविध भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली अाहे. देशातील प्रमुख ९१ धरणांत १०३.४३ अब्ज घनमीटर पाणीसाठा झाला अाहे. हा पाणीसाठा एकूण साठवणूक क्षमतेच्या ६६ टक्के अाहे, अशी माहिती केंद्रीय जल अायोगाने दिली अाहे.
सध्याचा पाणीसाठा हा गेल्या अाठवड्याच्या तुलनेत ६.७ टक्क्यांनी अधिक अाहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी कमी अाहे. उत्तर प्रदेशातील धरणांतील पाणीसाठा सरासरीपेक्षा २६ टक्क्यांनी, पश्चिम बंगालमध्ये १८ टक्क्यांनी अाणि पंजाबमध्ये ९ टक्क्यांनी अधिक अाहे, असे जल अायोगाने नमूद केले अाहे.
दक्षिण भारतातील धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी अाहे. तमिळनाडूमधील धरणांमध्ये सरासरीपेक्षा १० टक्क्यांनी कमी पाणीसाठा अाहे. कर्नाटक, केरळमध्ये १८ टक्क्यांनी कमी पाणीसाठा अाहे.
ईशान्य भारत अाणि मध्य भारतात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने तेथील धरणसाठ्यात वाढ झाली अाहे.
गेल्या अाठवड्यात देशातील विविध भागांत सरासरीपेक्षा २८ टक्क्यांनी अधिक पाऊस झाला अाहे. यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय जल अायोगाने दिली अाहे.