केळी
केळी  
मुख्य बातम्या

बदलत्या वातावरणामुळे केळी निसवणीवर परिणाम

Chandrakant Jadhav

जळगाव ः थंड, विषम वातावरणामुळे खानदेशात केळीच्या निसवणीसह वाढीच्या प्रक्रियेत बाधा येत आहे. चार ते पाच महिन्यांच्या केळी बागांमध्ये करपा रोग अधिक दिसत आहे. शेतकरी त्याचा अटकाव करण्यासाठी सध्या फवारण्या घेत आहेत. हेक्‍टरी पाच हजार रुपयांपर्यंतचा खर्च शेतकऱ्यांचा वाढला आहे. विशेष म्हणजे तापीकाठानजीक अधिक आर्द्रतायुक्त वातावरण असल्याने याच नदीकाठी या रोगाचे प्रमाण २० ते २५ टक्के एवढे आहे.  खानदेशात तापी काठावर रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, शहादा भागात केळीची लागवड केली जाते. करपा रोग चार ते पाच महिन्याच्या व निसवणीच्या अवस्थेतील बागांमध्ये अधिक दिसत आहे. जळगाव येथील केळी संशोधन केंद्राने केलेल्या सर्वेक्षणानुसार मागील महिन्यात करपा रोगाचे प्रमाण रावेरातील तापीकाठ व इतर भागात २५ टक्‍क्‍यांपर्यंत होते. अंदाजित १० ते १५ हजार हेक्‍टर क्षेत्र करपा रोगाने बाधित झाले आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर व तळोदा आणि शहादा (जि. नंदुरबार) भागात करपा रोगाचा फैलाव झाला आहे. हा फैलाव मागील हंगामाच्या तुलनेत अधिक आहे.  चार ते सहा महिन्यांच्या बागांमध्ये हा रोग वाढल्याने उत्पादनावर परिणाम काही केळी बागांमध्ये पोटॅशच्या कमतरतेमुळे केळीची पाने पिवळी पडल्याचेही सांगण्यात आले. करपाग्रस्त बागांमध्ये प्रतिझाड तीन ते चार पाने बाधित होऊन पिवळी पडली आहेत. करपा रोगाचा फैलाव लक्षात घेता केळी संशोधन केंद्राने राज्य शासनाच्या कृषी विभागाला करपा निर्मूलन कार्यक्रम राबविण्याचा कार्यक्रम सुरू करण्याची शिफारस नुकतीच केली आहे. हा कार्यक्रम लागू झाला तर शेतकऱ्यांना शासनाकडून करपा निर्मूलनासंबंधी बुरशीनाशके व इतर निविष्ठा अनुदानावर उपलब्ध होतील.  करपा रोगाचा अटकाव करण्यासाठी रावेर, मुक्ताईनगर भागातील शेतकरी प्रतिदिन खत व्यवस्थापनावर भर देत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी तीन फवारण्या घेतल्या आहेत. सुमारे २० हजार हेक्‍टरसंबंधी करपा निर्मूलनाबाबत शेतकरी कार्यवाही करीत असून, हेक्‍टरी पाच हजार रुपये खर्च यासाठी शेतकऱ्यांना हकनाक करावा लागणार आहे. कोट्यवधी रुपये उत्पादन खर्च यंदाही केळी उत्पादकांना करपा रोगासंबंधी पेलावा लागत असल्याची स्थिती आहे.    ठळक बाबी

  •    केळी संशोधन केंद्राच्या सर्वेक्षणानुसार रावेर, यावल, मुक्ताईनगरात २५ टक्‍क्‍यांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव
  •    करपा निर्मूलन कार्यक्रमासाठी शासनाकडे शिफारस
  •    चोपडा, पाचोरा भागात कमी प्रादुर्भाव
  •    सप्टेंबरनंतर उष्णता अधिक. मग नोव्हेंबर व या महिन्यात अधिक आर्द्रतायुक्त आणि थंड वातावरणाचा बागांवर परिणाम
  •    किमान तापमान १४ सेंटिग्रेडपर्यंत आल्याने निसवणीवर परिणाम शक्‍य 
  •    निसवणीच्या अवस्थेतील बागांमधील करपा रोग अधिक धोकादायक होण्याची शक्‍यता, उत्पादनावर परिणाम होणार
  • प्रतिक्रिया

    केळीवरील करपा मागील महिन्यातच रावेर, यावल व मुक्ताईनगर भागात दिसून आला. त्याचे प्रमाण २५ टक्के आहे. नेमके किती क्षेत्र बाधित झाले, याचा अंदाज बांधता येत नाही. परंतु उत्पादनावर याचा परिणाम होईल. चार ते पाच महिन्यांच्या बागांवर करपा अधिक दिसत आहे.  - नाझेमोद्दीन शेख, प्रमुख शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र, जळगाव

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT