पाणीपुरवठा योजनांच्‍या दुरुस्‍तीसाठी दोन कोटींची गरज
पाणीपुरवठा योजनांच्‍या दुरुस्‍तीसाठी दोन कोटींची गरज 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात चार पाणीपुरवठा योजनांसाठी २ कोटींची गरज

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे असलेल्या चार योजनांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी २० लाख रुपये तर जिल्हा परिषदेच्या सहा पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ५० लाख रुपयांची गरज आहे. या १० योजनांसाठी दोन कोटी ७० लाख रुपये शासनाच्या वतीने दिले जाणार आहेत. निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केले जाणार असून मार्चमध्ये या योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजन केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. 

जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व यंत्रणांच्या माध्यमातून सज्ज झाले आहे. जिल्हा परिषदेच्या १९ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना असून त्यापैकी आठ योजना सुरू आहेत. सहा योजनांची दुरुस्ती करून त्यातून गावांना पाणीपुरवठा करता येणे शक्‍य आहे. या सहापैकी व्होळे, जेऊर, कोर्टी आणि बोरगाव या योजनांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या योजनांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. जानेवारीअखेर निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. फेब्रुवारीअखेर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या नऊ टॅंकरद्वारे ३४ खेपांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातून २० गावांसाठी आणखी १७ टॅंकर मागणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. मंगळवेढ्यातील ४५ गावांसाठी चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला असून चारा डेपोच्या मार्गदर्शक सूचना येत्या चार दिवसांत प्राप्त होतील, अशी शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. 

तलाव भरून घेण्याचेही नियोजन उजनी कालवा, सीना नदी, म्हैसाळ, नीरा-भाटकर या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील तिसंगी, गावडी दारफळ, आष्टी, शिरनांदगी, घेरडी यासह अन्य महत्त्वाच्या तलावात पाणी भरून घेण्यात येणार आहे.

३६ टॅंकरची घटणार मागणी, २५ गावांची भागणार तहान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ११ योजना असून त्यापैकी दोन सुरू आहेत. नऊ बंद आहेत. बंद असलेल्या आंधळगाव, नंदूर, कोळेगाव आणि कव्हे या योजनांसाठी एक कोटी २० लाख रुपयांची आवश्‍यकता आहे. या योजना कार्यान्वित झाल्यानंतर जिल्ह्यातील २५ गावांची तहान या माध्यमातून भागणार आहे. या गावांसाठी आवश्‍यकता भासणाऱ्या संभाव्य ३६ टॅंकरची गरज या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT