चाळीसगाव तालुक्‍यात अद्यापही टॅंकर सुरूच
चाळीसगाव तालुक्‍यात अद्यापही टॅंकर सुरूच 
मुख्य बातम्या

चाळीसगाव तालुक्‍यात अद्यापही टॅंकर सुरूच

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यात यंदा पावसाने नाबाद ११५.५ टक्‍क्‍यांपर्यंत आजअखेर मजल गाठली आहे. असे असले तरी चाळीसगाव तालुक्‍यात चार गावांना तीन पाण्याचे टॅंकर सुरूच आहेत.  जिल्ह्याची पावसाची सरासरी ६६३.२ मिलिमीटर एवढी आहे. आजअखेरपर्यंत ७०१.२ मिलिमीटर अर्थात १०५.५ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यात दोनशे टॅंकर यंदा उन्हाळ्यात सुरू होते. ऑगस्टमध्ये इतर तालुक्‍यांतील पाणीटंचाई मिटली. मात्र, सप्टेंबर अर्धेअधिक संपला तरी चाळीसगाव तालुक्‍यातील चार गावांची पाणीटंचाई कायमच आहे.  टंचाईग्रस्त गावांत शिंदी, बोडर, करजगाव, चत्रभुज तांडा या गावांचा समावेश आहे. यंदा गिरणा धरणही शंभर टक्के भरले. त्यातून पाणी सोडण्यात आले. या धरणाचा गिरणा पट्ट्यातील गावांना पाण्याचा फायदा होतो. मात्र, चाळीसगाव तालुक्‍यात या पाण्याचा उपयोग का झालेला नाही? तेथे टॅंकर सुरू असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT