विसापूर पुणदी योजना सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी
विसापूर पुणदी योजना सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी 
मुख्य बातम्या

विसापूर पुणदी योजना सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन

सांगली : तासगाव तालुक्यातील दुष्काळात दिलासा देणाऱ्या विसापूर पुणदी उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. ही योजना सुरू राहिल्यास २६ गावांतील दुष्काळात दिलासा मिळेल. पाण्याअभावी योजना बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. योजना सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

टेंभू योजनेअंतगर्त राबविण्यात आलेल्या या योजनेतून गेल्या महिन्यात पाणी सोडण्यात आले. मात्र, पाणी नसल्याच्या कारणावरून गेली पंधरा दिवस योजना बंद राहिली. या योजनेच्या पाण्यामुळे सध्याच्या दुष्काळात अनेक गावांना दिलासा मिळाला होता. मांजर्डे, हतनूर, विसापूर, पासून ते सिद्धेवाडी, आरवडे, खुजगाव, लोंढे, कौलगे अशा अनेक गावांतील शेतीला या पाण्याचा लाभ होतो. 

ऐन दुष्काळात या पाण्यामुळे शेकडो एकर द्राक्षबागा वाचल्या. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मिटला. पूर्व भागात या भागातून शेतीसाठी पाण्याचे टँकर सुरू होते. मात्र निवडणूक संपली आणि पाणी नसल्याच्या कारणावरून ऐन मे महिन्याच्या उन्हाच्या तडाख्यात योजनेचे पाणी बंद करण्यात आले. दुष्काळाच्या झाला  वाढत आहेत. पाऊस येण्यास आणखी दीड महिन्याचा कालावधी आहे. शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लाभ क्षेत्रातील बागायत शेती धोक्यात आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT