in Satara district Farmers get into trouble due to rains
in Satara district Farmers get into trouble due to rains 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत

टीम अॅग्रोवन

सातारा : माण, खटाव, फलटणसह कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांत रविवारी (ता. १) अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची पुरती धांदल उडाली. तसेच पीक आडवे पडल्याने व भिजल्याने नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे. 

माण तालुक्‍याच्या बिजवडी परिसरातील राजवडी, पाचवड, अनभुलेवाडी, जाधववाडी तसेच म्हसवड परिसरातील पुळकोटी, बनगरवाडी, जांभुळणी, भाटकी, खडकी, कारखेल आदी गावांच्या परिसरात दुपारी चारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. सुमारे अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. रस्त्यावरूनही पाणी वाहू लागले. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी काढणीस आलेल्या उभ्या पिकांना मात्र या पावसाचा फटका बसला. 

फलटण तालुक्‍यात अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. सांगवी परिसरात सोमंथळी, सांगवी, अलगुडेवाडी, माळवाडीसह अनेक ठिकाणी वादळी पावसाने गहू, ऊस, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. कऱ्हाड-पाटण तालुक्‍याच्या विविध भागात वादळी पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपासून हवेत वाढलेल्या उष्म्याने हैराण झालेल्यांना या पावसानंतर दिलासा मिळाला. दरम्यान पावसाने काही ठिकाणी आंब्याच्या मोहराचे नुकसान झाले, तर गव्हासह रब्बीतील काढणीला आलेल्या पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. 

उंडाळे परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरवात झाली. उंडाळे येथील आठवडा बाजार असल्यामुळे व्यापाऱ्यांची, ग्राहकांची तारांबळ उडाली. काही व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले. शेतात तोडलेला ऊस कसा बाहेर काढायचा, हा प्रश्‍न शेतकरी व ट्रॅक्‍टर चालकांपुढे निर्माण झाला आहे. ऊसतोड मजुरांच्या झोपडीमध्ये असणारे साहित्यही या पावसामुळे भिजून नुकसान झाले. खटाव तालुक्यातील कातरखटाव परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने सुरवात केली. काही वेळातच भागात पाणी पाणी झाले. जवळपास अर्धा तास पाऊस झाला. ज्वारी पिकाची काढणी सुरू असून, ज्यांनी ज्वारी काढून रानात पसरून ठेवली आहे, त्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले.

द्राक्षे, बाजरी, आंब्याच्या फुलोऱ्याला फटका उशिरा पेरणी केलेल्या ज्वारी, बाजरीची पिके फुलोऱ्यात असून या पिकांच्या कणसांवरील फुलोरा पावसामुळे झडून गेला. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. द्राक्ष बागांच्या घडाचेही या पावसाने नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याची झाडे मोहराने फुलून गेली असताना तो झडण्याचाही प्रकार घडला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT