food grain  
मुख्य बातम्या

अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन 

देशात यंदा विक्रमी ३०५.४४ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाले आहे. यात भात, गहू, मका आणि हरभऱ्याचेही विक्रमी उत्पादन झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने हंगाम २०२०-२१ च्या तिसऱ्या सुधारित अंदाजात दिली.

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली ः देशात यंदा विक्रमी ३०५.४४ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाले आहे. यात भात, गहू, मका आणि हरभऱ्याचेही विक्रमी उत्पादन झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने हंगाम २०२०-२१ च्या तिसऱ्या सुधारित अंदाजात दिली. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकतेच देशातील २०२०-२१ मधील शेती उत्पादनाचा खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामांतील सुधारित तिसरा अंदाज जाहीर केला आहे. सुधारित तिसऱ्या अंदाजानुसार देशात यंदा विक्रमी ३०५.४४ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन ७.९४ दशलक्ष टनांनी अधिक आहे. मागील हंगामात २९७.५० दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाले होते. तर यंदा सरासरी अन्नधान्याच्या तुलनेत २६.६६ दशलक्ष टन अधिक उत्पादन होणार आहे. 

यंदा भाताचे १२१.४६ दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ११२.४४ दशलक्ष टन भाताचे उत्पादन झाले होते. यंदा उत्पादनात ९.०१ दशलक्ष टन वाढ होण्याची शक्यता आहे. तर गव्हाचे १०८.७५ दशलक्ष टन उत्पादन होईल, असे म्हटले होते. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.३२ दशलक्ष टनांनी अधिक आहे. गेल्या वर्षी १००.४२ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. भरडधान्य उत्पादनात यंदा १.९१ दशलक्ष टनांनी वाढ होऊन ४९.६६ दशलक्ष टन होणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या हंगामात हा आकडा ४७.७५ दशलक्ष टन होता. 

तेलबिया उत्पादनही यंदा विक्रमी पातळीवर झाले असून, ३६.५७ दशलक्ष टन झाले आहे. गेल्या वर्षी ३३.२२ दशलक्ष टन तेलबिया पिकांचे उत्पादन झाले होते. यंदा उत्पादनात ३.३५ दशलक्ष टनांनी वाढ झाली आहे. तर सरासरीच्या तुलनेत यंदा ६.०२ दशलक्ष टन अधिक उत्पादन झाले आहे. उसाचे उत्पादन ३९२.८० दशलक्ष टनांवर राहण्याचा अंदाज आहे. ऊस उत्पादन सरासरीपेक्षा ३०.७३ दशलक्ष टनांनी अधिक आहे.  कडधान्य उत्पादनातही वाढ  केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदा कडधान्य पिकांच्या उत्पादनात ३.६४ दशलक्ष टनांनी वाढ झाल्याचे म्हटले आहे. हंगामात २५.५८ दशलक्ष टन कडधान्य उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर देशातील सरासरी कडधान्य उत्पादन २१.९३ दशलक्ष टन आहे. यंदाच्या उत्पादनाने सरासरीचाही टप्पा पार केला आहे. 

प्रतिक्रिया देशात शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, भारत सरकारची धोरणे आणि त्यास राज्य सरकारांची महत्त्वाची साथ यामुळे यंदा देशात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होऊन शकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत कृषी विकासावर लक्ष केंद्रित करत आहेत.  - नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषिमंत्री 

उत्पादनाचे अंदाज पुढीलप्रमाणे (दशलक्ष टनांत) 

  • अन्नधान्य ः ३०५.४४ 
  • भात ः १२१.४६ 
  • गहू ः १०८.७५ 
  • भरडधान्य ः ४९.६६ 
  • मका ः ३०.२४
  • कडधान्य ः २५.५८ 
  • तूर ः ४.१४ 
  • हरभरा ः १२.६१ 
  • तेलबिया ः ३६.५७ 
  • भुईमूग ः १०.१२ 
  • सोयाबीन ः १३.४१ 
  • मोहरी ः ९.९९ 
  • ऊस ः ३९२.८० 
  • कापूस ः ३६.४९ दशलक्ष गाठी 
  • ताग आणि मेस्ता ः ९.६२ दशलक्ष गाठी 
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

    Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

    Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

    Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

    Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

    SCROLL FOR NEXT