Currant season in trouble due to return of foreign workers 
मुख्य बातम्या

बेदाणा हंगाम बाकी; परराज्यातील कामगार परतले

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे लॉकडाउन जाहीर होईल, अशी भीती निर्माण झाली असल्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार राज्यातील कामगारांनी गाव गाठले आहे.

Abhijeet Dake

सांगली ः देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे लॉकडाउन जाहीर होईल, अशी भीती निर्माण झाली असल्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार राज्यातील कामगारांनी गाव गाठले आहे. बेदाणा हंगाम अद्यापही १० ते १५ टक्के बाकी असताना कामगार गावाकडे गेल्यामुळे बेदाणानिर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात स्थानिक कामगारांवर भार पडला आहे. 

जिल्ह्यातील प्रामुख्याने कवठेमहांकाळ तालुक्यासह तासगाव, मिरज पूर्व भाग बेदाणानिर्मिती केली जाते. या भागात दरवर्षी सुमारे ५ ते ६ हजार उत्तर भारतीय कामगार बेदाणानिर्मिती करणाऱ्या शेडवर येतात. सुमारे तीन ते चार महिने ते बेदाणा शेडवर काम करून पुन्हा आपल्या गावाकडील शेतात कष्ट करतात. गेल्या वर्षी बेदाणानिर्मितीच्या ऐन हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे देशात लॉकडाउन करण्यात आला होता. वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यामुळे त्यांना गावाकडे जाता आले नाही. परिणामी, या संकटात त्यांचे हाल झाले. बेदाणा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यातही यंदाही कोरोनाच्या भीतीने उत्तर भारतीय बेदाणानिर्मितीसाठी मजुरांची संख्या कमी झाली असली, तरी त्यानंतर मजुरांची संख्या वाढली. 

या वर्षी ते पुन्हा आले. मात्र ते सावध होते. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांत देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या मजुरांत अस्वस्थता निर्माण झाली. कोरोना संकट वाढत असताना सातत्याने सरकारकडून लॉकडाउनची चर्चा केली जात असल्याने ते घाबरले. पुन्हा येथे अडकून पडलो तर गावी जाता येणार नाही, याची त्यांना धास्ती होती. त्यामुळे त्यांनी हंगाम पूर्ण न करताच गावी जाण्याचा निर्णय घेतला. 

बेदाणा निर्मितीमधील अडथळे

  • परराज्यांतील कामगारांना यंदाही अडकून पडण्याची भीती 
  • बेदाणानिर्मितीत उत्तर भारतीय कामगारांचा हातखंडा 
  • स्थानिक कामगार बेदाणानिर्मिती कामात फार कमी 
  • शेडमालक स्वतः कामाला लागले 
  • अवकाळी पाऊस दणका देत असल्याने अडचणी 
  • कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे मजुरांत भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे मजुरांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यातच आता सरकारकडून लॉकडाउनची चर्चा सुरू झाल्याने शेडवर काम करणारे परराज्यांतील मजूर गावी निघून गेले आहेत. त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात स्थानिक मजुरांकडून हंगाम पूर्ण करून घ्यावा लागणार आहे.  - सुनील माळी,  बेदाणा शेडमालक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Market: हिंगणघाट बाजार समितीत ५२३ ट्रक कापसांची आवक

    Vitthal Rukmini Prakshal Puja: श्री विठ्ठल-रुक्मिणीची पंढरपुरात प्रक्षाळपूजा उत्साहात

    Vice Chancellor Post: कुलगुरुपदासाठी १२ कृषी शास्त्रज्ञ स्पर्धेत

    Farmer Protest: कांद्याच्या थकित रकमेसाठी ‘नाफेड’ कार्यालयात ठिय्या

    SMART Project: कालावधी उलटूनही सरंगी समितीचा अहवाल नाही

    SCROLL FOR NEXT